कुत्रा आणि गाढव

एकदा कुत्र्यात अन गाढवात
पैज लागते कि , जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेन.
तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन.

ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले ,

कुत्र्याला वाटले मीच जिंकेन .

कारण गाढव पेक्षा मी जोरात धावू शकतो ,

पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते .

शर्यत सुरु झाली

कुत्रा जोरात धाऊ लागला.

पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली ,

असाच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , घडत राहिले

कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला

तर बघतो

तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते

तिकडे अन त्यांनी शर्यत जिंकून ते राजा झाले होते
अन ते बघून

निराश झालेला कुत्रा बोलला कि

जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते

तात्पर्य काय
१.आपल्याना विश्वासात घ्या

२.आपल्याना  पुढे जाण्यास सहकार्य  करा,त्याना प्रोत्साहन  द्या

३.नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील

४. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा

       *🙏आपली_माणसं🙏_मोठी_करा*

Punekar Special

तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो.

"अंगठा मारून झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये".

त्यावर एका पुणेकराने लिहिले,

दिड शहाण्यानो.... ते लिहिलेल वाचता आल असत तर अंगठा मारला असता का????

बिनडोक कुठले!....
😂😆😜😝

#बायको #wife

#बायको
बायको वरील पोस्ट टाकणं म्हणजे तिला समजणं नसत!!!
किंबुहना
पोस्ट टाकून कधी ती समजत हि नसते !!! बायको ह्या शब्दाला जर फोडले तर "बा" म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम पणे उभी राहणारी "य" म्हणजे येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणारी आणि "को" म्हणजे कोणासाठीहि नाही तर फक्त आणि फक्त नवऱ्यासाठी जगणारी !!! सुख दुःखात साथ देणारी म्हणून तिला बायको असं म्हंटलं जात!!! मैत्रिणीला सहज समजून घेतलं जातं पण बायकोला मैत्रिण बनवलं तर आयुष्य किती सुंदर होईल शेवटी नवऱ्यापेक्षा अधिक जवळचा मित्र तिच्यासाठी कोण असेल !!!!!
बाहेर मैत्री आणी मैत्रिणी शोधण्यापेक्षा बायको मध्येच मैत्रीण सापडली तर तिला आणखी काय हवं !!!!!! प्रत्येक नवऱ्याला वाटत बायकोसाठी खूप काही करावं लागतं पण सत्य परिस्थिती अशी असते तिला लागते नवऱ्याची साथ!!!! हातात भक्कम हात!!! समजून घेणार हृदय !!! इतकं प्रेम कि तिला माहेरच्या लोकांची आठवण हि ना यावी !!!! एक जवळचा मित्र !!! आणि जो अहंकार बाजूला ठेवून तिच्याशी वागेल !!! ज्याच्या जवळ इतकं मन मोकळं करता येईल की मैत्रिणीची हि गरज नाही भासणार!!!" जिच्या डोळ्यात आपल्यामुळे कधीच अश्रू नाही येणार !!!!!! एक स्त्री म्हणून मान!!! आणि तिच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भक्कम साथ बस इतकंच मिळालं कि ती झोपडीला हि स्वर्ग बनवेल !!!!! आणि भाकरीचा तुकडाही तिला पंचपक्वान्न वाटेल आणि नवऱ्याच्या मिठीत स्वर्ग सुख बस आणखी काहीही नको असत कुठल्याही बायकोला म्हणून म्हणते ,,,,,,,,,,,,
बायको वरील पोस्ट टाकणं म्हणजे तिला समजणं नसत
बायको म्हणजे एक संसारासाठी सतत तेवणारी ज्योत असते !!!!
स्वतःला विसरून नवऱ्यासाठी जगणारी आयुष्यभराची साथ असते!!

#भाऊबीज #bhaubij #bhaiduj

💖बहीण 💖                        
        💖एक अनोखं नातं💖

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....!🌹🌹🌹भाऊबीज च्या सर्व बहिण - भावांना  हार्दिक शुभेच्छा 💐💐

Nice Lines

*एक उम्र वो थी कि जादू में भी यक़ीन था...*
*एक उम्र ये है कि हक़ीक़त पर भी शक़ है.....✍🏼*

जिनके दिल बहोत अच्छे होते हैं.. अकसर किस्मत उनकी ही खराब होती है।

आज भी उसके ख़त पढ़ कर मुस्कुरा देते है..
झूठ भी बड़े प्यार से लिखती थी वो...😉

*प्यार सबको आजमाता है*
*सोलह हज़ार एक सौ आठ रानियों को मिलने वाला श्याम*
*एक राधा को तरस जाता है.*

जिन्दगी में आप जो 
करना चाहते है, वो जरूर कीजिये, ये मत सोचिये कि लोग क्या कहेंगे। क्योंकि 
लोग तो तब भीकुछ 
कहते है, जब आप कुछ नहीं 
करते।

इस अफ़सोस के साथ न उठो कि कल आप क्या नहीं कर पाए,

बल्कि इस सोच के साथ उठो कि आज आप क्या कर सकते हो!

एसटी संप

एसटी चा जो संप चालू आहे त्यावरून मला एक वर्षांपूर्वीचा अपघात आठवतोय .

स्थळ सावित्री नदी , महाड

रात्री १२ ची वेळ . . .
राजापूर मधून बस निघाली . . .
२३ प्रवासी झोपेत . .
चालक वयाची पन्नासी गाठलेला . .
अचानक . . काय झाले माहित नाही ..
पण गाडीला . . एक मोठा धक्का बसला . .
पूर्ण वेगाने पाणी . . घुसले . .
आणि पूर्ण काळोख . .

दोन दिवसांनी . . बस चे तुकडे मिळाले . .
त्यात मुख्य इंजिन चा भाग . . आणि चालकाची सीट मिळाली . .

आणि

मृतदेह हॅन्ड ब्रेक ओढलेल्या अवस्थेत सापडला . . . . .

बस . .

या पलीकडे नाही लिहू शकत 

एसटी  कर्मचाऱ्यांनी संप केला प्रवाश्यांच्या संतप्त प्रतिक्रिया  प्रशासनाने देखील हा संप बेकायदेशीर ठरवला परिवहन मंत्र्यांनी तर धमकीच दिली की सरळ कारागृहात डांबू म्हणून ..

मला एक सांगा अश्या कोणत्या मागण्यासाठी त्यांनी संप केला अवास्तव मागण्या आहेत का ? नाही  आपण जी दिवाळी ला उटणे लावून अंघोळ करतो न ती अंघोळ पण त्यांच्या नशिबात नसते ती अंघोळ त्यांची कुठे तरी लॉज मध्ये किंवा एखाद्या डेपोमध्ये होत असते त्यांना सन,ऊन पाऊस वारा माहीत नाही
सण कोणताही असो हिंदू मुस्लिम शीख पारसी यांचा कोणताही सण हा त्याच्या घरी साजरा नाही करत हे नक्की

त्यांचे वेतन जेमतेम दहा हजार आणि त्यांना कपात होऊन  मिळते 8 ते 9 हजार
मग त्यांनी सातव्या वेतन आयोगाची मागणी केली तर त्यात गैर काय..

अहो कबाड कष्ट  रक्ताचे पाणी  करून कष्ट करणाऱ्या प्राध्यपकांना एक लाख ते दीड लाख मानधन असणाऱ्याना  सातवा वेतन आयोग मिळू शकतो तर एसटी कर्मचाऱ्यांना मिळायलाच पाहिजे

प्रवाश्याची गैरसोय होतंय हे मान्य पण एसटी कर्मचाऱ्यांची  ही गैरसोय बाबत सरकारने दखल घ्यावी यासाठी पण हा संप आवश्यक असेल  कदाचित
माझा पाठिंबा आहे या संपास  आपण ही पाठिंबा द्यावा

*संपूर्ण आयुष्य झिजवून . .  . .  .  . खालील लोक तमाम मराठी माणसासाठी मरताना दिसतात*

*एसटी - ड्रायव्हर कंडक्टर*
* आपले सैनिक *
*खाजगी दवाखान्यातील* *कर्मचारी ,*
*पोस्टमन*
*कंत्राटी कामगार*

याना . . नेहमी भरभरून मिळावे असे वाटते .

हि लोकं नेहमी झिजताना दिसतात .

मागण्या मान्य होऊन संप लवकर मिटू दे .

एसटी . . पोरकी आहे तुमच्या विना . ...

आवडल्यास जास्तीत जास्त पुढे पाठवा 🙏🙏🙏🙏

माणसं

खूप भावली ही कविता !
माहिती नाही कोणी लिहली आहे !
---------------------------------------
*दोन शब्द जगण्याविषयी* 🕊

कुणाला आपला कंटाळा येईल
इतकं जवळ जाऊ नये

चांगुलपणाचे ओझे वाटेल
इतके चांगले वागू नये

कुणाला गरज नसेल आपली
तिथे रेंगाळत राहू नये

नशीबाने जुळलेली नाती जपावी
पण स्वतःहून तोडू नये

गोड बोलणे गोड वागणे
कुणास अवघड वाटू नये

जवळपणाचे बंधन होईल
इतके जवळचे होऊच नये

सहजच विसरून जावे सारे
सल मनात जपू नये

नकोसे होऊ आपण
इतके आयुष्य जगूच नये

हवे हवेसे असतो तेव्हाच
पटकन दूर निघून जावे
आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी
राहील इतकेच करून जावे.

*कारण*
जीवनाच्या वाटेवर
साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात,
ती ही असतात..... *माणसं !*

संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात
ती ही असतात..... *माणसं !*

वेडं लावतात,
वेडं ही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात
ती ही असतात..... *माणसं !*

पाठीशी असतात,
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात ,
वाट लावतात
ती ही असतात..... *माणसं !*

शब्द पाळतात,
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात,
गळा कापतात
ती ही असतात ...... *माणसं !*

दूर राहतात,
तरी जवळचीच वाटतात,
जवळ राहून देखील,
परक्यासारखी वागतात
ती ही असतात
*सारी आपलीच माणसं !*

Happy Diwali Marathi SMS

💫💥✨🎁💥💰💫💥✨                                पणत्या  सजून तयार आहेत
तेल आणि वातींसह
आकाशकंदील विराजमान झालाय
छोट्या छोट्या चांदण्यांसह
दरवाजाही केव्हापासून
तोरण बांधून सज्ज झालाय
अंगणही नटून बसलंय
रांगोळीचा गालिचा घेऊन
डबे सगळे तुडुंब आहेत
तिखट गोड स्वादासह
घर आता डोलू लागलंय
आनंदाच्या लहरींवर
आणि मन. ..
मन अगदी प्रफुल्लित
लाख लाख शुभेच्छांसह
आजचा दिवस त्याच शुभेच्छा देण्याचा...
" आपणा सर्वांना  दिपावलीच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा "
💫💥✨💫💥✨💫💥✨💫

#Happy #Diwali #Marathi #Sms

Happy Diwali

*🎆दिपावली शुभेच्छा🎆*

सस्नेह नमस्कार,

*दिपावलीच्या* आजपासून ते *भाऊबीज* पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास *मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!*

हे नववर्ष आपणास *आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी* जावो ह्याच मनोकामना...! 🙏

Happy Diwali

आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस, हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
॥ धनाची पुजा॥🍃
॥ यशाचा प्रकाश॥☀
॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥☺
॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥🙏
॥ संबंधाचा फराळ॥😍
॥ समृध्दीचा पाडवा॥💐
॥ प्रेमाची भाऊबीज॥😀

!!!अशा या दिपावलीच्या
  अपणांस हार्दिक शुभेच्छा!!!
👏🎁🎁🎊🎁🎁?👏

हि दिवाळी अपणांस व
आपल्या कुटुंबीयांस
सुखाची, सम्रुद्धीची व
भरभराटिची जावो हीच
सदिच्छा.

Happy Diwali 2017

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🌋🌋🌋🌋🌻🌻🌻🌻🌻
दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा....  !!!!!

16 oct- वसुबारस !
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
.🐮🐮🐮🐮🐮🐮🐮🌹🌹

17 oct. धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
.👑👑👑👑👑👑👑👑👑

18 Oct . नरकचतुर्दशी !
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
19 oct लक्ष्मिपुजन !
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
.🍁🍁🍁🌻🌻🌻🍁🍁🍁
.
2O octपाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

21 oct. भाऊबीज !
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहो दे !
👫👫👫👫👫👫🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जाओ...👏👏👏👏
💐💐💐💐💐💐💐💐💐

✌🏻आज पहिला दिवा✌🏻
   🙏🏼🌺 रमा एकादशी 🌺🙏🏼
   दिपावलीच्या तुम्हा व तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा🔥💥🎆🎇
🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆

🏮🏮  🏮🏮

❗चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती...
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी...
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती...

अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती...☝🏽

♨♨♨ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ♨♨♨

🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆

Love you Dost

I love dost
एक दोस्त ने क्या खूब लिखा है कि

"मरने के बाद मुझे जल्दी ना जला देना
मेरे दोस्तों को देर से आने की आदत है" ....!

​दोस्ती​ शब्द का अर्थ
बड़ा ही मस्त होता है .., ( दो+हस्ती )
जब दो हस्ती मिलती हैं ..,
                  तब दोस्ती होती है ... ...
​समुंदर​ _ _ ना हो तो _ ​​कश्ती​ _ _ किस काम कीं ...​                                       
​मजाक​_ _ना हो , तो _ _ ​मस्ती​ _ _ किस काम की ... _                            
​दोस्तों​ _ _ के लिए तो कुर्बान है , ये _ _ ​जिंदगी...​ _                          
अगर _ _ ​दोस्त​ _ _ ही ना हो , तो फिर ये _ _ ​जिंदगी​ _ _ किस काम कीं ...
👌 चंद लाइने दोस्तों के नाम 👌:-*

"क्यूँ मुश्किलों में साथ देते हैं "दोस्त"
                     "क्यूँ गम को बाँट लेते हैं "दोस्त"
"न रिश्ता खून का न रिवाज से बंधा है !
       "फिर भी ज़िन्दगी भर साथ देते हैं "दोस्त "
Aap apne sab best friend ko send karo agar me hu to muje bhi send karo
👉ek पल Dost ke naam 🌹🌹🌷🌷

Happy Vasubaras

१. *आज वसुबारस !*
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो ! .
दिवाळीचा पहिला दिवस,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙂

Happy Diwali

आनंदाची दिवाळी आली
मन ही स्वच्छ करायला घ्या
जुन्या दुःखद आठवणींची जळमटे काढून फेका
अपमानाचे डाग धुवून टाका
अपयशाची खंत इथे तिथे रेंगाळत असेल तर तिला टोपलीत भरुन बाहेर नेऊन टाका
आशेचे नव्हे, विश्वासाचे नवीन दिवे लावा
प्रसन्नतेची तोरणे दाराखिडक्यांना लावा
उत्साहाच्या सुंदर रांगोळ्या अंगणभर घाला
प्रेमाची पक्वान्ने बनवून सगळ्यांनी मिळून पोऽऽऽऽटभर खाण्याचे ठरवून टाका, भिऊ नका! शुगर वजन बीपी वगैरै काही वाढणार नाही.
वाढलाच तर आनंद वाढेल आयुष्यातला! आणि हो, आयुष्यही वाढेल उदंड

दिवIलीच्या  हार्दिक शुभेच्छा 🙏🏻💐😄

Happy Diwali 2017

मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख  समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...
💐💐💐💐💐💐💐💐
#Happy #Diwali #2017

Positive Status

*आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा...*

बाटली

पिणाऱ्यांची 🍺 इज्जत सुध्दा दिवाळीत वाढते. 😎

जेव्हा गल्लीतली लहान पोर येऊन विचारतात...

"काका, बाटली आहे का हा रिकामी❓❔"🚀
😄😃😀😁😁😁

आई बाबा

लग्ना नंतर खरच मुल ही बायको साठी आई बापाला वार्यावर सोडतात ??

जड झालेले आई-बाप*

नेहमीप्रमाणे 5.30 ला ऑफिस सुटल्यावर परतीची 5.44 ची बोरीवली फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो. ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा 'राजेशचा' मला फोन आला... म्हणाला, "मला थोडी शॉपिंग करायची आहे तू मालाडला उतरल्यावर थोडं थांब, मी आलोच..!"
मी "हो थांबतो" म्हटलं.
मालाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच एम.एम. मिठाईवाल्याचं दुकान आहे उजवीकडे पाणपोई आहे आणि बाजूलाच पार्किंगसाठी आडवे लोखंडी अँगल लावलेले आहेत. त्यावर चढून मी राजेशची वाट बघत बसलो.
एक 70-75 वयाचे गृहस्थ, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा, थोडे मळकटलेले सदरा-धोतर नेसलेले माझ्या जवळ आले. मी त्या लोखंडी अँगलवर 3-4 फुटांच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडघे धरले आणि म्हणाले, "ए बाबा.. एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल...!"
ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमधले वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना बघून वाटत नव्हतं..
अचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं. मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगलवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं, "आजोबा तुम्हाला भूक लागलीय? हे घ्या पन्नास रुपये तिथून घ्या तुम्हाला जे हवंय ते..!"
ते म्हणाले, "नको बाबा नको.. पैसे नको.. एक वडापाव घेऊन दे तेवढा"
मी म्हटलं, "थांबा इथेच मी घेऊन येतो."
एम एम मधून मी लगेच दोन वडापाव आणून आजोबांना दिले. ते जमिनीवर बसून खाऊ लागले.
मला म्हटले, "वर नको बसू , पडशील... इथं बस माझ्या बाजूला, कुणी सोबत बसलं की मलाही जातील दोन घास !"
मी आदरंच बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली... कुठून आलात? कुठे जायचंय? कोणाला शोधताय? वैगेरे वैगरे.
"मी हिंगोली वरून आलो आहे. तिथेच एका खेडेगावात राहतो बायकोसोबत. तुझ्याएवढा आमचा एकुलता एक मुलगा इथं मुंबईत मोठया कंपनीत इंजिनीअर आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने प्रेमविवाह केलाय. त्याची बायको शिकलेली, नव्या विचारांची आहे. तिला सासू-सासरे म्हणजे आम्ही गावठी (गावंढळ) वाटतो. तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही. त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या 2 वर्षांपासून. परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता. म्हणाला, अमेरिकेत नोकरी मिळाली आहे. बायकोला घेऊन 10 वर्षांसाठी जात आहे...
इथं मुंबईत असताना येत होता गावी आम्हा म्हातारा म्हातारीला सहा महिन्यातून एकदा भेटायला. मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर,  वेळ नाही आता परवा लगेच विमानाने निघायचंय असं म्हणाला.
पुढचे 10 वर्ष जगतोय की मारतोय कोण जाणे.. म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊन. काल संध्याकाळ पासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय. पण इथं मालाडमध्ये विमानतळ नाही असं म्हणतायत इथली लोकं..!"
मी म्हणालो, "बरोबर म्हणतायत लोकं, इथं मालाडला नाही, सांताक्रुज ला आहे Airport.
आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले, "परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा. हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं... फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलाचा...त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येतोय तुला भेटायला म्हणून"
आता माझ्या एका हातात त्यांचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता. आधी मोबाईलची बटणं दाबून पहिली... मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्क ही फुल होतं...
मी विचारलं, "तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन?"
"मला फोन लावता येत नाही, उचलता येतो फक्त" ते म्हणाले.
मी received call मध्ये जाऊन शेवटी परवा आलेल्या call वर डायल केलं.. समोरून फोन cut करण्यात आला...
मग मी तो कागद उघडून पाहिला... *त्या कागदावर पत्ता होता- छत्रपती शिवाजी विमानतळ, एम एम हॉटेल समोर, मालाड पश्चिम, मुंबई.*
मी समजून गेलो होतो, त्या मुलाने आपल्या आई वडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा फोनही घेत नव्हता... मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं.
तेवढ्यात माझा मित्र तिथे पोहोचला. त्याला मी म्हटलं दोन मिनिटं थांब फक्त राजेश...
आणि मी आजोबांकडे पाहत विचारात पडलो...
मला कळत नव्हतं, मुलाकडून होणारी त्यांची ही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असून ती स्वीकारायची नव्हती?  कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल..
आजोबांना मी म्हणालो, "आजोबा एव्हाणा तुमच्या मुलाचं विमान सुटलं असेल.. तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही. तुम्ही जसे आलात तसे परत जा गावी. आजी तुमची वाट बघत असतील घरी. एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले.
अश्रू भरल्या डोळ्यांतून ते माझ्याकडे पाहत होते. तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले.. आणि विचारलं, "मगासपासून मी तुमच्या हातात तो डब्बा पाहतोय, काय आहे त्या डब्यामध्ये? "
ते म्हणाले, "मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहेत. त्याच्या आईने बनवून पाठवलेत त्याच्यासाठी...
आता मात्र एका धारदार सुऱ्याने काळजात वार करावा आणि सर्व अंतःकरण रक्तबंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली. मी निशब्द तसाच त्यांच्याकडे बघत बसून राहिलो....
तेवढ्यात मित्राचा आवाज आला, "चल ना ऐ...!"
आणि मी भानावर आलो... त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो...
घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती. राहून राहून एकच प्रश्न पडत होता...
*'आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा, भुकेने हतबल झालेला तो माणूस.. आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवांच्या डब्यातल्या एक लाडू खाऊ शकत नव्हता...? इतकं प्रेम????'*

नक्की वाचा

गरूडभरारी म्हणजे काय ?

गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं,पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोधट आणि वाकडी होते. त्याची नखं निकामी होतात. त्याच्या पंखातील बळ कमी होतं. सावज पकडणं त्याला जमत नाही. जीवनातील शौर्य संपलं . आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते. नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं. कमालीचं नैराश्य जगणं असह्य होऊन जातं.
पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो. एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर.
त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते; मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपसून काढतो. किती वेदना होत असतील; पण तो ते सहन करतो. नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वत: चे पंख उपसून फाडून काढतो. बिनपंखांचा गरड पुन्हा एकटा राहतो. काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात.
आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षॆ जगतो.
स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही तितिक्षा (वेदना हसतमुखानं सहन करणं म्हणजे तितिक्षा) . एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते.

ही कथा ऐकताना माझ्या अंगावर रोमाचं उभे राहिले. वाटून गेलं हा गुण माणसात आला तर माणसं दात काढलेल्या सापासारखं सरपटत बसणार नाहीत. नविन परिवर्तनाला सामोरं जाताना अंगावरून काय मुलायम मोरपीस फिरणार नाही तर त्या गरूडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल हे माणसानं जाणलं पाहिजे.
परिवर्तन हे तितिक्षेच्या झाडाला आलेलं फूल आहे हे समजलं पाहिजे.
🎭
"रडतोस काय माणसा , बदलाला सामोरं जा. परिवर्तनाची तुतारी फुंक आणि भोग परिवर्तन . नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात. तोड ती तुझी नैराश्याची बोथट झालेली चोच, उपट तुझी ती आळसानं बोथट झालेली नखं ; फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे आणि पुन्हा एकटा वाट बघ. या सृष्टीचं सृजनत्व नक्कीच तुला नवसंजीवनी देईल. निराशेचं तुटलेलं मुंडकं हातात घेऊन शौर्याचं खड्ग पुन्हा एकदा तळपव त्या काळ्या खडकावर आणि सज्ज हो पुन्हा एकदा गरूडभरारी घ्यायला..!!
🙏👌खुप छान पोस्ट👌🙏