Showing posts with label थोडे Important. Show all posts
Showing posts with label थोडे Important. Show all posts

उधारी

*व्यावसायिक उधारी कशी हाताळाल*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*आज पासून ऊधारी बंद करा* 
---------------------------------------------------
*भारतातील जवळ जवळ ३६% लहान व्यवसाय उधारीमुळे बंद पडतात, यात मुख्यत्वेकरून किराणा दुकान, बिल्डिंग मटेरियल, कृषी खते व औषधे इत्यादी अनेक प्रकारचे लहान मोठे व्यवसाय येतात. उधारीची सुरवात ही अगदी लहान प्रमाणात व वैयक्तिक ओळखीमुळे होते. व्यवसाय वाढावा म्हणून दुकानदार उधार देतो व शेवटी उधारी वसूल न झाल्यामुळेच व्यवसाय बंद करायची वेळ येते. या विषयावर काही मार्गदर्शक तत्त्वे व्यावसायिकांनी घालून घेतली पाहिजेत.*

*१)* वैयक्तिक ओळख व घसट करू नका. 'घोडा घाससे दोस्ती करेगा तो खायेगा क्या?' व्यवसाय करत असताना ग्राहकांशी वैयक्तिक व खाजगी व्यवहार, बोलणे चालणे टाळा. तुम्ही व्यवसाय करण्यास बसला आहात, हे ओळखी व मैत्री वाढवायचे माध्यम नव्हे. पैसा हाच तुमचा मित्र हे लक्षात ठेवा.

*२)* कामाशिवाय बसू नये, व्यवसायाच्या ठिकाणी हा नियम तुम्ही लावा. ग्राहकांना त्यांच्या खरेदी व व्यवसायाव्यतिरिक्त बिनकामाचे फार वेळ बसू देऊ नये. यातूनच उधारीला सुरुवात होते.

*३)* स्पष्टवक्तेतपणा ठेवा. 'विनंती केली आहे. आम्ही काय पळून जातो का? ऐवढा विश्वास नाही का?' नम्रपणे हात जोडा व सांगा, 'दोस्ती मेरे से करो, धंदे से नही. उधार मागू नका, मित्र म्हणून मी एक काय दोन वेळा चहा पाजतो.'

*४)* काही प्रमाणात व काही दिवसासाठी काही व्यवसायात उधारी द्यावीच लागते. उदा. कंपनीचे टेंडर, दुधाचा व्यवसाय, पेपर दूध इत्यादी. अशा उधारीचे प्रमाण एकूण व्यवसायाच्या उलाढालीच्या २५% हून अधिक नसावे म्हणजे काही प्रमाणात उधारी उशिरा वसूल झाली तर फारसा फरक पडणार नाही

*५)* वह्या भरलेल्या व गल्ला मोकळा. काही जणांची मी हास्यास्पद परिस्थिती पाहतो. उधारीच्या वह्या भरलेल्या, एकूण १० लाख येणे आहे पण आज गल्ल्यात ५ हजारही नाहीत. खेळता पैसा नसल्यामुळे धंदा ठप्प झालेला असतो.

*६)* प्रत्येक ग्राहकाची उधारी पेलण्याची ऐपत लक्षात ठेवून उधारी द्या. एखाद्याच्या दोन महिन्याच्या कमाईपेक्षा जास्त उधार देऊ नका. पहिली उधारी दिली नसेल, तर इथून पुढे रोखीने व मागची उधारी घ्या. त्याला २ ते ३ टप्पे करा.

*७)* कोणत्याही सबब पुराव्याशिवाय उधार देऊ नका. उदा. पी.डी.सी चेक, कायमचा पत्ता, नोकरीचे ठिकाण इत्यादी. स्वत:कडे जेवढे भांडवल असेल तेवढ्याचीच उधारी करा, बाजारातील उचललेल्या मालावर उधारीचा धंदा करू नका, नाहीतर दोन्हीकडची पण जाईल. उधारीची भीड चेपत नसेल, तर धंदाच करू नका; कारण तो निश्चित नुकसानीचा मार्ग आहे.
प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.* 
 
*टिप.हा लेख  सर्व ऊधारी वाल्या व्यावसायिक बंधू ना समर्पित.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Trek

हे "ट्रेक" म्हणजे नक्की काय  ?
कधी कधी आपल्याच
नातेवाईकानपैकी अथवा मित्रपरिवारा पैकी कुणीतरी बोलून
जातं. ज्याचा ट्रेक विषयी काहीही संबंध नसतो .
काय रे , नुसतेच आपले डोंगर चढता उतरता ?
काय मिळत त्यातून तुम्हाला ?उगाच वेळ वाया , पैसे वाया ?
नीट घरी बसा ना ?
एक दिवस मिळतो कुठे आठवड्यातून सुट्टीचा ..तो देखील
असा उनाडायला घालवता . ?
दर शनिवार रविवार बघाव तर हा बाहेर ? कुठे तर ट्रेक
ला म्हणे ? काय मिळत त्यातून ..देव जाणे ?
असे वाक्य आपल्या आप्त मंडळीकडून हमखास
ऐकायला मिळतात .
अन आपण ते वाक्य ह्या काणाकडून त्या काणाकडे
अगदी सहजतेने भिरकावून मोकळे हि होतो .
कारण त्यांना सांगून समजावून हि काहीहि उपयोग नसतो. पण
समजणारे समजतात .
आपला मुलगा /मुलगी इतर मुलांसारखा वाईट मार्गाला तर
नाही ना हे त्यांना पटलेले असतं .
शिवरायांबद्दल प्रेम अन आदर हा असतोच त्यांच्यात...
तर ट्रेक म्हणजे नक्की काय?
ट्रेक म्हणजे नुसतंच डोंगर चढणं - उतरणं नाही .
ट्रेक म्हणजेच नुसतंच काही मौज मजा हि नाही .
ट्रेक म्हणजे मनाने मनाला दिलेली हाक
ट्रेक म्हणजे शिवतेजाची प्रेरणादायी आग
ट्रेक म्हणजे आडवाटेची नुसतीच पायपीट न्हवे
ट्रेक म्हणजे निथळत्या घामाचे थकवे थेंब न्हवे
ट्रेक म्हणजे चैतन्याची नवी उमेदी लाट
ट्रेक म्हणजे अभिमानाची सह्याद्रीची साद
ट्रेक म्हणजे नुसतंच सैरवैर भटकण - पाहाणं न्हवे
ट्रेक म्हणजेच आभाळाची व्याप्ती मोजणं हि न्हवे
ट्रेक म्हणजे गड-किल्ले अन शौर्याचा इतिहास
ट्रेक म्हणजे चिराचीरातुनी घूमघुमलेला आवाज
इतकंच न्हवे ..
तर ट्रेक म्हणजे निसर्गातल्या हरएक घटकांशी
अगदी मुक्तपणे केलेला संवाद .
ट्रेक म्हणजे साऱ्यांशी जुळवून घेतलेला हर एक श्वास...
ट्रेक म्हणजे गती
ट्रेक म्हणजे योग्य दिशा .
ट्रेक म्हणजे जीवनाची शिस्तबद्ध हालचाल
ट्रेक म्हणजे प्रेम
जीवनावर , जगण्यावर , इथल्या मांणसा माणसांवर
माणुसकीवर ...........
ट्रेक म्हणजे .........................बरंच काही .....
खेड्या खेड्यातुनी पाहिलेली
जीवनाची विविधरंगी रहाट गाडी..
असा हा ट्रेक करतेवेळी सृष्टी सौंदर्याची ....विविध
मनवेडी रूपं पाहता येतात. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

महिन्यातुन एकदा तरी गड-किल्ले-दुर्गावारी करा,
रोग आणि आजारांतुन बाहेर पडा.
दुर्ग सर करणा-या मावळ्यांना श्वसन, रक्तप्रवाह, गुडघे, छाती पोट आणि मानसिक आजार होणार नाहीत.
आधुनिक वैद्यकशास्त्रात याचे संदर्भ आढळत नसतील असे समजुन याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा स्वतः एकदा खात्री करा. मग तुम्ही स्वतःच या गोष्टीचा प्रचार कराल.
● श्वसन - गडावर खालुन वर चढताना श्वासांची प्रक्रिया जलद होते,
त्यामुळे पुर्ण श्वासोच्छ्वासाची क्रिया घडते.
श्वासोच्छ्वासाच्या क्रियेला चालना मिळते.
● रक्तप्रवाह - श्वासोच्छ्वास जलद झाल्यामुळे रक्तप्रवाह वाढतो, रक्ताभिसरणाची क्रिया जलद होते.
शिरांतील, नसांतील ब्लॉकेज निघतात.
महिन्याला दुर्गाची वारी
ब्लड-प्रेशरचा आजार दुर करी..!
● गुडघे - पायांवर ताण येतो,
सर्व स्नायु उत्तेजित होतात.
● छाती - वर चढताना दम भरल्याने फुफ्फुसे पुर्ण क्षमतेएवढी हवा आत घेतात आणि बाहेर सोडतात.
● पोट - गुरुत्वाकर्षणाच्या विरुध्द चालताना डीहाइड्रेशन मुळे शरीरातील पाणी पातळी कमी होते, पण गडावर गेल्यावर झरा, तळी, पावसाचे अतिशुद्ध पाणी पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते,
दैनंदिन दुषित पाण्यामुळे होणारे पोटाचे विकार दुर व्हायला हातभार लागतो.
शरीरावरील चरबी कमी होते.
● मानसिक आजार - रोजच्या धकाधकीच्या जीवनातील ताण-तणाव हे गडावरील मनाला प्रसन्न करणारे वातावरण, निसर्गाचे मुक्तहस्त चित्रण, निसर्गाचे रंग-रुप पाहुन दुर होतात.
गडावरील सौंदर्य पाहुन भारलेले मन घेऊनच खाली आल्याशिवाय आपण राहत नाही.
मनाची प्रसन्नता वाढते आणि ताण-तणाव निवळायला मदत होते.
चला मग दुर्गांच्या वाटेवर..!!

Save Forts Save Heritage.🙏

जगात कुणीही 'श्रेष्ठ'  वा  'नीच' नाही, 

एका ब्राम्हणाने पत्नीला विचारले...

"पाणी छान आणि थंड आहे.
आपल्या घरात फ्रिज नाही,
कुठुन आणलेस..?"

पत्नीः-
"शेजारच्या कुंभारा कडुन.!"

ब्राम्हण ः-   काय..?

त्या शुद्राचे पाणी मला पाजलेस, तुला लाज वाटत नाही...? आपण ब्राम्हण आहोत...
आपल्याला शुद्राचे
काही चालत नाही..?"

पत्नीः- (घाबरली व म्हणाली)
" मला माफ करा,
या पुढे अशी चुक
होणार नाही....

[दुस-या दिवशी.]

ब्राम्हण ः-
"अग...
जेवायला वाढ..!"

पत्नीः
"काही-नाही..!"

ब्राम्हण ः-
"काय...?
पोळी केली नाही..?"

पत्नीः-
" नाही....!
कारण...
तवा व चुल शुद्र लोहाराने
व चुल कुंभाराने बनवलेली असल्याने मी त्या वस्तू
फेकून दिल्या..!"

ब्राम्हण ः- "वेडी आहेस काय..?
बरं दुध आण..!"

पत्नीः-
"मी दुध फेकुन दिले
कारण....
ते शुद्र गवळ्याने दिले.

मी म्हटले
'उद्या पासुन दुध आणू नकाे'
आम्हांला शुद्रांचे
काही चालत नाही..!"

बाम्हणः बर मी बाहेर चाललोय माझी चप्पल कुठे आहे.....???

पत्नीः ते मी बाहेर टाकले. .

ब्राम्हण : का?????

पत्नी : ते चप्पल तुम्हाला एका शुद्र चांभाराने दिले होते म्हणून टाकले. ......

ब्राम्हण ः (किंचाळला)
" काय...?"
ब्राम्हण :- "बरंबर" ...
झोपायला खाट लाव..!"

पत्नी म्हणाली ः-
"मी खाट तोडून टाकली
व लाकडे जाळुन टाकली.
मेलं शुद्राचं काहीच नको
आपल्याला..!!"

ब्राम्हणाने डोक्याला हात लावला
म्हणाला :- "अरे...
ईथली धान्याची पोती
कुंठ आहेत..?''

पत्नीः-
"मी धान्य लोकांना वाटून टाकले कारण....
ते आपण कुणबी शुद्रां कडुन
घेतले होते.
नकोच ते आपल्याला ..!"

ब्राम्हणाला भाेवळ आली
व म्हणाला,
" माझे आई... घरात एवढा कचरा व घाण का ??
केरसुणी शूद्राने बनवलेली होती म्हणून मी ती फेकूम दिली .
ब्राम्हणाचे डोके गरगरले  ....
घरात काहीच दिसत नाही.
वस्तू कुठं गेल्या..?"

पत्नी म्हणाली :-
"नाथ...
घरातली प्रत्येक वस्तू कुण्यातरी
शुद्रांनेच बनवली आहे.
त्यामुळे...
मी त्या तोडुन मोडुन
जाळुन टाकल्या..!"

ब्राम्हण मोठयाने ओरडला
म्हणाला,
" अरे आपण
पार भिकारी झालो...
एवढे घरंच काय ते
उरले आता...!"

पत्नी म्हणाली,
" नाथ...
चिंता करू नका,
मी आपल्या आज्ञे पुढे नाही,
मी हे घर दान करून टाकले आहे.
कारण... हे घर त्या शुद्र गवंडी वडार व शुद्र मजुरांनी बांधले होते,
नकोच बाई आपल्याला शुद्राचे."
"नाथ....
चला आपण जंगलात जावू
कारण...
इथे सर्व शुद्र आहेत,

भिक्षा काय शुद्राला मागायची..?
नको नको..!"

ब्राम्हण चक्कर येवुन
खाली पडला,
"हे देवा...
मी तर पार शुद्रापेक्षा
अतिशुद्र आहे.
माझ्याकडे कांहीच नाही,
मीच खरा शुद्र आहे,
माझे पानही शुद्रा शिवाय
हालत नाही...
देवा...
खरे उच्च शेतकरी
सर्व अठरा पगडं जातीच महान
व वंदनीय आहेत, मी मात्र  काहीच कामाचा नाही..!"

मग त्या ब्राम्हणाने संपुर्ण समाजाची खाली डोके टेकुन
माफी मागीतली
व पत्नीच्या चरणावर
लोटांगण घालुन
तीची...
कान उघडल्यामुळे
आभार मानले..!
👇
👇
👇
👉🏿लक्षात ठेवा
जगात कुणीही 'श्रेष्ठ'  वा  'नीच' नाही,  सर्व समान व एकमेकांस पुरक आहेत..
Massage आवडला तर नक्की शेअर करा.

1. गाई-म्हशी विकत घेणे –
प्रकल्प खर्च - ६ लाख - १० जनावरे
(शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी साठी ३३.३३% एस सी/एस टी साठी )

2. शेळीपालन –
प्रकल्प खर्च ४.५ लाख - ५० शेळ्या २ बोकड
(शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस सी –एस टी)

3. कुक्कुटपालन –
प्रकल्प खर्च - ८ लाख -५००० पक्षी
(शासकीय योजना २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस सी –एस टी)

4. शेडनेट हाऊस –
प्रकल्प खर्च - ३.५ लाख – १० गुंठे
(शासकीय योजना - ५० % )

5. पॉलीहाउस -
प्रकल्प खर्च -११ लाख - १० गुंठे
(शासकीय योजना - ५० % )

6. मिनी डाळ मिल –
  प्रकल्प खर्च -१.८८ लाख
  (शासकीय योजना - ५० % )

7. मिनी ओईल मिल –
  प्रकल्प खर्च -५ लाख
(शासकीय योजना - ५० % )

8. पॅकिंग व ग्रेडिंग सेटर-
३५ % सर्वसाधारण क्षेत्रासाठी अनुदान (१७.५० लाख प्रती आकार ९*८ मी.

9. ट्रॅक्टर व अवजारे –
प्रकार १- (शासकीय योजना-०८ ते २० PTOHP रुपये १ लाख अनुदान /३५ % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-२० ते ७० PTOHP रुपये ७५ हजार अनुदान /२५  % -इतर लाभधारकांसाठी )

10. पॉवर टिलर -८ बीएचपी च्या कमी
प्रकार १- (शासकीय योजना-५००००/- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-४० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी )

11. पॉवर टिलर -८ बीएचपी च्या जास्त 
प्रकार १- (शासकीय योजना-७५ हजार /- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-६० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी )

12. काढणी व बांधणी यंत्र –
शासकीय योजना –रुपये १.२५ लाख ( ५० % )

13. रोटाव्हेटर-२० बीएचपी खालील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-३५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-२८ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
रोटाव्हेटर-२० बीएचपी वरील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-४४ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-३५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी

14. कडबा कुट्टी यंत्र/ पेरणी यंत्र-
२० बीएचपी खालील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-१५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-१२ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
२० बीएचपी वरील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-१९ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-१५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी

15. उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका –( किमान २ ते ४ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी )
अनुदान – ४०% भांडवलाच्या निगडीत २५ लाख प्रती हेक्टर

16. छोट्या रोपवाटिका साठी -–( १ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी )
अनुदान – ५०  भांडवलाच्या निगडीत १५ लाख प्रती हेक्टर

17. गोडाऊन(वेअर हाउस)-
  प्रकल्प खर्च-३५ लाख -१००० मे. टन
  (शासकीय योजना-२५ %)

18. शीत गृह –५००० मेट्रिक टन साठी
(शासकीय योजना-३५ % अनुदान सर्वसाधारण क्षेत्रासाठी /५०% आदिवासी आणि डोंगराळ भागासाठी )
२८०० प्रती मे .टन प्रकार १ साठी
३५०० प्रती मे .टन प्रकार २ साठी.

19. गांडूळ खत प्रकल्प –
प्रकल्प खर्च-६०० घनफूट प्रोरीत धरतीवरती
(शासकीय योजना-५००००/- प्रती उत्पादन प्रकल्प

20. उसाच गुऱ्हाळ -
प्रकल्प खर्च- १४ लाख
(शासकीय योजना- ५० %)

21. फळ प्रक्रिया उद्योग -
प्रकल्प खर्च- २४ लाख
(शासकीय योजना - ४० %)

22. फळबाग लागवड (एन.एच.बी.)-
  प्रकल्प खर्च- २० लाख - १० एकर
  (शासकीय योजना- ४० %)

23. स्पिरुलीना (शेवाळ शेती)-
   प्रकल्प खर्च- ४.५ लाख
    (शासकीय योजना - ५० % )

24. भाजीपाला सुकवणे-
   प्रकल्प खर्च-२४ लाख
   (शासकीय योजना-४० %)

25. कृषि सल्ला व सेवा केंद्र –
   प्रकल्प खर्च-५ लाख
   (शासकीय योजना-४०%)

26. सोयाबीन मिल्क व उत्पादने-
     प्रकल्प खर्च- ८ लाख
     (शासकीय योजना- ४० %)

27. कृषी पर्यटन (अॅग्रो टूरीझम)-  प्रकल्प खर्च-१० लाख

वरील माहिती थोडक्यात दिली असून या आणि यासारख्या किमान २०० पेक्षा अधिक योजना दर वर्षी राबविल्या जातात या बाबत अधिक माहिती तुम्हाला या लिंक वर
http://goo.gl/s0q2cS वर मिळेल.
Or www.startupfriend.in

जर ही पोस्ट तुमच्या उपयोगी नसेल तरी आपल्या किमान १० शेतकरी बांधवाना जरूर पाठवा.
🌱🌿🍂🍃🌿🍃🌴🌳
🙏धन्यवाद.

*हे कायमचे लक्षात ठेऊया:*

*1) 🤑🌶🍒 लिंबू-मिरची खायची असतात - बांधण्यासाठी नसतात..*

*2) 😱🐈 मांजर पाळायची असते - मांजर आडवी गेली कि काही वाईट होत नाही.उलट उंदरांपासून नुकसान होण्याचे टळते.*

*3) 🗣💭💃 शिंक येणे हा नैसर्गिक प्रकार आहे - शिंकल्याने काही अघटीत होत नाही किंवा काही अडचणीही येत नाहीत..*

*4) 💀🌳 भूत झाडावर राहत नाही - झाडावर पक्षी राहतात..*

*5) 🔬🔭 चमत्कार असे काही नसते - प्रत्तेक गोष्टी मागे विज्ञान आहे प्रत्येकाला कारण आहे..*

*6) ⛄☃ बुवा, बाबा लोक खोटे आहेत - ज्या लोकांना अंग मेहनत करायची नसते तेच हे लोक..!!*

*7) ⛈🌪👺🔥 करणी,         जादू टोणा काही नसते - हे भ्याड लोकांच्या मनाचे खेळ आहेत..*
*जादू-टोणा करून ग्रहाची दिशा बदलणारे हे ढोंगी बाबा: वारा, ढगांची दिशा बदलून पाऊस का पाडत नाहीत...?*⛈☁🌒💫

*8)🌏🐠वास्तुशास्त्र भ्रामक आहे. केवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे.*
*खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा* *क्षणाला दिशा बदलत असते.*
*खरेच कुबेर उत्तर दिशेला* *असता तर जगातील इतर ठिकाणी कसा आला नाही.*

*9) 👼🐓🐐🍇🍎नवसाने,  व्रताने, पुजेने, नैवैद्याने, बळीने, देणगीने, प्रसन्न होऊन फळ देतो देव, म्हणजे तो काय लाचखाऊ आहे का ?!!*

*10) हे जे वाचलात ते स्वता अनुकरण करा आणि आपल्या मित्रांना देखिल send करा ।*

*हा मैसेच बाकी ग्रुपवर send केल्यामुळे काही चांगली बातमी येणार नाही पण पुढची पीढ़ी नक्की  सुधरे

☀  मुहूर्ताचे वेड ☀
ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!! जन्माला येताना कधी मुहर्थ पहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते. सगळेच दिवस,, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आपल्यासाठी  सर्वच दिवस सर्वच वेळ शुभ आहे..!!

☀ कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढले जातात तरी अनेक स्त्रीया विधवा व पुरूष विधूर का होतात...? 
पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का  होतात, तर काही अकाली मृत्यू होतात असे का..?
95% विवाह हे मुहूर्तानुसार वेळेवर लागत नाहीत तरी मुहूर्ताचा आग्रह का धरावा...?
  
☀ मुहूर्त पाहून निवडणुकीसाठी उभे राहणा-या सर्व उमेद्वारांपैकी एकच निवडून येतो आणि बाकीचे आपटतात. असे का घडते.....? एकालाच मुहूर्त शुभ होता काय ?

मंत्रीपद मिळाल्यानंतर  मंत्रालयाची  जबाबदारी स्वीकारण्यासाठी  व खुर्चीवर बसण्यासाठी  शुभ मुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात...????  मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते !

☀ शुभ मुहूर्तावर  मूल जन्माला घातल्यास  वैज्ञानिक,  राष्ट्रपती,  पंतप्रधान  होईल काय..?
☀ अंबानीच्या जन्म मुहूर्ताला जन्माला आलेली  व्यक्ती ....ती पण ..अंबानीसारखी  झाली का...?

☀ उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर  , उद्योजक, आपल्या कार्यालयाचे  बांधकाम करतांना,  व्यवसायास प्रारंभ करतांना मूहूर्त पाहूनच सर्व करतात.....तरी सुद्धा  कित्येकांना अपयश येते असे का...?

         :  कारण :
☀   शुभमुहूर्त  हे थोतांड आहे सत्य नव्हे... ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो ,तेच लोकं अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.
☀मुहूर्त पाहणारी पेशवाई नष्ट झाली ...आणि कधीही मुहूर्त न पाहणारी .....ब्रिटिशशाही अख्खा  भारत देश गिळून बसली.
☀स्वतःवर व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा. चांगले कर्म हेच देव-ईश्वर माना.

☀ जर कोणता पंडित, ज्योतिषी, बुवा, बापू, कापु, झापु महाराज,साधू ,साध्वी तथा वास्तूशास्त्र विशारद शुभमुहूर्तावरच सर्व काही केल्यास तथा वास्तूशास्त्राप्रमाणेच बांधकाम केल्यास यश येईल असे सांगत असतील तर..... स्टँम्प पेपरवर लिहून देण्यास सांगा.  यश न आल्यास नुकसानभरपाईचा दावा ठोकेल  असे सांगा . ते तुमच्या जवळही फिरकणार नाहित.
कारण त्यांनाही माहित असते हे सर्व थोतांड आहे.

☀ जर तुमचं  मन साफ असेल व  तुमच्यात प्रयत्न करण्याची क्षमता असेल....तर तुमच्यासाठी कोणतीही  वेळ  ही  ' शुभ मुहूर्तच ' असते " चला तर आजपासून शुभ-अशुभ या चक्रात न पडता विज्ञानवादी होऊ या.

🙏🏻चला..जगण्याची दिशा बदलूया..!!

सुरुवात स्वतःपासून..!!🙏🏻

Satya Narayan

आपल्या घरच्या बायाला हे
वाचून दाखवा 👇🏻👇🏻👇🏻👇🏻
भटांचा सत्यनारायण कोठुन आला
👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻

🌞कथा ही सत्य नारायणाची 🌞
    🌞आधुनिक सत्य कथा 🌞

ऐका सत्य नारायणाची कथा...
दूर होतील आता तुमच्या व्यथा,
21व्या शतकात सुरू होईल नवीन प्रथा।।
हा! हा!! हा!!!

पुण्यात एक प्रतिष्ठीत ब्राम्हण पंडित होते, त्यांची एक विधवा मुलगी होती.नाव तिचं सत्या  ती विधवा असल्यामुळं फारशी चारचौघात मिसळत नसे.तिचे ब्राह्मणाने मुंडण केलेले होते.

तरीही ती खूप सुंदर दिसत  होती ,आणि मुख्य म्हणजे तरुण होती .सदर ब्राह्मणाच्या घरी एक माळी होता ,बागकाम करायला.फावल्या वेळेत इतर कामात मदत करायचा. त्याच नाव होतं नारायण.त्याची ये जा घरात चांगलीच होती.या कामाच्या येण्याजाण्यात त्याची अपघातानं या कन्येशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झालं. आगीजवळ लोणी आलं अन ते वितळलं. तिला दिवस गेले ,पण ही गोष्ट लक्षात यायला खूप उशीर झाला होता.कारण विधवेकडे लक्ष कोण देतो ? हे दुर्लक्ष महाग पडलं . ब्राम्हणाचा नाईलाज झाला .त्यानं मुलीला अडगळीच्या खोलीत कोंडलं, आणि नारायणाला मारुन टाकलं .

इकडे गरोदर मुलीचे नऊ महिने पूर्ण झाले ,एका रात्री या विधवेनं पहाटे चार वाजता एका गोंडस बाळाला जन्म दिला .ब्राम्हणानं ते बाळ उचललं आणि परसदारी  नेऊन केळीच्या बनात केळीच्या बुंध्याशी ठेवलं .ते रक्तानं माखलेलं बाळ ठेवताना ती केळही रक्तानं माखली . ब्राम्हणाला वाटल,ं कुणी श्वापद येऊन ते बाळ खाऊन टाकील आणि आणखी पाप
होण्यापासून आपली सुटका होईल .पण झालं उलटच!

ते बाळ थंडीमुळं आणि चिलटं चावल्यामुळं  व्याकुळ होऊन टाहो फोडून रडायला लागलं . त्या चिमण्या आवाजानं आसमंत जागं झालं . काही लोकांना आवाज आला .कुणाचं बाळ इतक रडतयं हे पाहाण्यासाठी लोक जमू लागले .पहाट झाली .सगळा गाव गोळा झाला . इकडे ब्राम्हणाला कुणकुण लागली.काहीच घडलं नाही अशा अविर्भावात ब्राम्हण केळीच्या बागेत आला आणि जोर जोरात ओरडू लागला केळ व्यायली, केळ व्यायली!केळीनं दिव्य बाळाला जन्म दिला!! चमत्कार झाला!!! भाबड्या लोकांचा या चमत्कारावर लगेच विश्वास बसला. कारण केळीवर रक्ताचे डाग होतेच. लोकांनी बाळाला उचललं. कपड्यात गुंडाळलं .पण बाळ रडायचं काही थांबेना . कारण बाळ भुकेजलेल होतं .

आता बाळाला दुध कोण पाजणार  ? मग ब्राम्हणानेच युक्ती सुचवली .म्हणे गावात दवंडी पिटवा ,जी महिला बाळाला गप्प करील तिला हे दिव्य बालक दिलं जाईल. दिव्य बालक मिळेल या लालसेनं महिलांची रांग लागली . पण असा कसा कुठल्याही बाईला पान्हा फुटेल ? गावातल्या सगळ्या बाया येऊन गेल्या . बाळ काही रडायचं थांबत नव्हतं .शेवटी शोध सुरु झाला कुणी बाई राहिली आहे का ? कुणीतरी सुचवलं की ब्राम्हण पंडिताचीच विधवा मुलगी आता शिल्लक राहिली आहे. तिला तरी आणून बघा .मग तिला बोलावण्यात आलं.तिनं बाळाला जवळ घेताच बाळ गप्प झालं.झालं!!! उध्दार झाला ब्राम्हणाच्या पोरीचा! मग त्या अनौरस दिव्य बालकाचं नाव ठेवले गेलं,
सत्या + नारायण =सत्यनारायण! केळीच्या पोटी जन्म झाला म्हणून सत्यनारायण चार केळीच्या खांबामध्ये ठेऊन पुजला जातो . अशी हि साठाउत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मित्रांनो ही कथा वाचल्यावर पुराणकथा कशा रचल्या गेल्या असतील ह्याची कल्पना यावी. हा पगडा एवढा जबरदस्त आहे की, अशी व्रते करण्यात स्त्रियाच आघाडीवर असतात.कारण पुरूषाने धार्मिकतेच्या आडून स्त्रियांना मानसिक गुलाम बनवले आहे. अशा कथांतून स्त्रीचा आणि पर्यायाने पूर्ण कुटूंबाचा उद्धार होतो असे भासवले जाते.

शिवरायांच्या काळात सत्यनाराणाचा मागमूस नव्हता, म्हणूनच शिवाजी राजांनी कधी सत्यनारायण पूजल्याचा दाखला इतिहासात सापडत नाही.त्याचा जन्म उत्तर पेशवाईत झाला. कारण ब्राह्मणांना पेशव्यांकडून मिळणारा रमणा म्हणजे दक्षिणा मिळणे बंद झाले.सत्यनारायणाची पूजा अगदी अलीकडची आहे. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बंगालमध्ये सत्येन पीर हा मुस्लिम दर्गा होता. या पिराची पूजा-उरूस दरवर्षी होत असे. त्याला प्रारंभी फक्त मुसलमान जमत.नंतर ब्राह्मणही जाऊ लागले. पुढे काहीतरी गडबड झाली आणि ब्राह्मणांनी जायचे बंद केले. पर्यायी पूजा करण्यास सुरुवात केली. त्यासाठी सत्येन मधल्या ‘ सत्ये’ चा ‘ सत्य’ केला आणि ‘ न’ चा ‘ नारायण’ झाला आणि ‘सत्य- नारायण’ अस्तित्त्वात आला.ब्राह्मण पुरोहित वर्गाने हा नवा धंदा तात्काळ ओळखला आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने वाढविला. त्यासंबंधीच्या पोथ्या लिहिल्या.स्कंद पुराणात सत्यनारायणाची कथा घुसडली आणि त्याला प्राचीनतेचा, पौराणिकतेचा टच दिला.

गाडगे बाबांनी तर या देवाला चुलीत घाला म्हणून सांगितलंय .जर सत्यनारायण साधूवाण्याची बुडालेली  बोट वर  काढू शकतो तर दुस-या महायुध्दात बुडालेल्या बोटी सत्यनारायण घालून वर काढून दाखवा , आव्हानही त्यांनी धर्म मार्तंडांना केलं होतं. आजवर ते शक्य झालेल नाही.

म्हणून मित्रांनो, आतातरी डोळे उघडा.आख्खा हिंदू धर्म भटांच्या थोतांडांनी ,खोट्या भंपक कथांनी विकृत झालाय, हे समजून घ्या. आणि कर्मकांड टाळा. नशीबापेक्षा प्रयत्नांवर भर द्या. वैज्ञानिक सृष्टी जशी आपलीशी केलीत तशीच वैज्ञानिक दृष्टीही स्वीकारा म्हणजे आत्मविश्वासाने संकटांवर मात करण्याची शक्ती मिळेल.