नावलौकिक केलेल्या व्यक्ती

"प्रेरणा घ्या नावलौकिक केलेल्या व्यक्तींच्या ज्याच्या हाती फक्त  शुन्य होते..."

🌸डाँ.ए.पी.जे.अब्दुल कलाम🌸
वडील नावाडी होते .विद्यार्थीदशेत असताना ते वर्तमानपत्र विकत होते ते शास्त्रज्ञ झाले राष्ट्रपती झाले.

🌸 शेक्सपिअर 🌸
  खाटीकखान्यात नोकरी करत होते रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभळता सांभळता एका नाटककाराचा जन्म झाला..

🌸 लता मंगेशकर 🌸
वडिल वारल्यावर त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी कोल्हापूरला स्टुडिओत नोकरी केली.कष्टात दिवस काढले .घर सांभाळले .विविध भाषेत पन्नास हजार गाणि म्हंटली .भारतरत्न हा त्यांना सर्वोच्च किताब मिळाला ...

🌸 ग.दि.माडगूळकर 🌸
मँट्रिक नापास झाल्यावर उदबत्त्या विकल्या .अनवाणी आयुष्य जगले.त्यांनी गीतरामायण लिहले..

🌸 गुलजार 🌸
फाळणी नंतर दिल्लीला आले.मोटार गँरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. बिमल राँय भेटले .मोटार गँरेजमधले आयुष्य फिल्म इंडस्ट्रित आले...

🌸 सुधिर फडके 🌸
चहा भाजीचा व्यापार करत होते .प्रारंभीच्या काळात त्यांना पोटासाठी वाद्य विकावी लागली .भटकंतीतून त्यांना सुर शोधला .ते गायक झाले, संगीतकार झाले ....

🌸 नीळू फुले 🌸
पुण्याला काँलेमध्ये अकरा वर्षे माळी होते.झाडांची निगराणी करता करता ते राष्ट्रसेवादलाच्या पथकात सामील झाले .नटसम्राट निळू फुले महाराष्ट्राला माहीत झाले...

🌸 विष्णूपंत छञे 🌸
घोड्याच्या पागांमध्ये चाबूकस्वार म्हणून तीन रुपये पगारावर नोकरी करत असताना स्वताःच स्वताःचा मार्ग शोधला.भारतातील पहिली ग्रेट सर्कस निर्माण केली ...

🌸 दारा सींह 🌸
पंजाबमधल्या एका सामान्य खेड्यात आखाड्यात कुस्ती खेळत होते .रानात गुरं चरायला जात होते .गुरांना सांभाळता सांभाळता कुस्तीची आवड निर्माण झाली.जगभर कुस्त्या जिंकल्या .चित्रपटात कामे केली .राज्यसभेत खासदार म्हणून जाताना मनात एकच भावना असते एका खेडेगावात आखाड्यात कुस्ती खेळणारा मुलगा खासदार झाला...

🌸एम. एफ. हुसेन 🌸
मुंबईच्या फुटपाथवर सीनेमाची पोस्टर्स रंगवली .पुढच्या आयुष्यात त्यांची चित्रे शंभर कोटींना विकली गेली .भारतात चिञकलेच्या इतीहासात एक नवा विक्रम नोंदवला गेला....

🌸 कर्मवीर भाऊराव पाटिल 🌸
कंदिल आणि नांगराचे विक्रेते होते.कंदिल नांगर विकता विकता त्यांनी रयत शिक्षण संस्था निर्माण केली ....

🌸 ग्रेटा गार्बो 🌸
गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला.तेराव्या वर्षी गरीबीमुळे शाळा सोडावी लागली .दुकानात सेल्सगर्ल म्हणून नोकरी करत असताना अचानक हाँलीवुडचे दरवाजे उघडले ....

🌸 चार्ली चँपलिन 🌸
प्रचंड गरिबी अनुभवली विद्यार्थीदशेत फुले विकण्यापासुन अनेक कामे केली .आपल्या विनोदाने जगभरच्या लोंकाना हसवले...

🌸 सुशीलकुमार शिंदे 🌸
सोलापूरला कोर्टात शिपाई होते.कोर्टाच्या आवारात त्यांनी आयुष्याचा अर्थ शोधला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले....

🌸 लक्ष्मणनराव किर्लोस्कर 🌸
दहा वर्षे ड्राईंग टिचर होते.त्यांनी नांगराचा कारखाना निर्माण केला ..

🌸 यशवंतराव गडाख 🌸
अहमदनगर जिल्ह्यात घोडेगावला शिक्षक होते .मुलांना फळ्यावर मुळाक्षर शिकवता शिकवता त्यांनी शाळेच्या बाहेरचे जग बघितले वयाच्या पंचविशीत सोनाईला मुळा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली ....

🌸 धिरुभाई अंबानी 🌸
वडिल प्राथमिक शिक्षक होते. सासरे पोस्टमन होते.भाऊ रेशनिंग आँफिसात नोकरीला होता .स्वताः ते पेट्रोल पंपावर क्लार्क म्हणून तीनशे रुपये पगारावर नोकरी करत होते .अशा वातावरणात स्वतःचे औद्योगिक साम्राज्य निर्माण केले ....

🌸 स्टीव्ह जाँब्स 🌸
कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवावे लागले .जगातल्या मोठ्या काँम्प्युटर कंपन्यापैकी एक 'अँपल'
ची स्थापना केली....

🌸 सुनील दत्त 🌸
रेडिओ सिलोनवर अभिनेत्यांच्या मुलाखती घेत असतानाच चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला.अभिनेता व राजकारणी म्हणून समृद्ध आयुष्य जगले....

🌸 जाँनी वाँकर 🌸
बस कंडक्टर होता.प्रवाशांची तिकीटे फाडता फाडता त्याच्या सिनेमाची तिकिटे लोंकानी घ्यायला सुरुवात केली .एका तिकीटाचा प्रवास दुसऱ्या तिकीटावर स्थीरावला....

🌸 महेमूद 🌸
ड्रायव्हर होता.चलती नाम गाडी ,सबसे बडा रुपया त्याने म्हणायला सुरुवात केली .आणि गाडीचे व्हील हातातून केव्हा निसटून गेले ते स्वताःलाही समजले नाही.....

"या सर्व मोठ्या माणसांच्या हाती शुन्य होते .त्यांनी अथक परिश्रमाने शुन्यातून विश्व निर्माण केले .अनवाणी आयुष्याला आकार दिला परिस्थितीशी झगडत संघर्ष करणाऱ्या माणसापुढे आदर्श ठेवला ..👍

Sukhkarta Dukhharta

गणपती पुढे - सुखकर्ता दुखहर्ता




नवऱ्यापुढे - असकर्ता तसकर्ता
😂😂😂😂😂

पाखरू नाचतय माझ

Dj लावा
किंवा
ढोल पथक बोलवा.
पण.........
नाचताना असं नाचा,
की
तुमची गर्लफ्रेंड पण बोलली पाहिजे," मंडळ लोकाच् अन् पाख!रू नाचतय माझ""..
कारण *देव येतोय माझा* 😘😘😘🙌🙌🙌🙋‍♂👑🙏🙏🙏🙏🙏🙏 2 दिवस बाकी........
मोरया.........🙏🙏🙏🙏

Friends

Story of friends
--------------------------------------
एक जंगल. जंगलात दोन वाघ.
दोघेजण अगदी जवळचे आणि जुने मित्र असतात. लहानाचे मोठे एकत्र झाले, खूप काही शिकले, जंगल पाहिले, जंगलाचे कायदे-समजून घेतले, एकत्र शिकार केली ... खूप काही, पण एक दिवस एका फालतू कारणामुळे त्यांच्यात भांडण होवून आणि दोघे वेगळे होतात. बरीच वर्षे जातात दोघांनाही त्यांची जीवनसाथी मिळते मुले होतात.
एकदिवस त्यातील एका वाघाचे विवळणे दुसऱ्याला ऐकू येते. दुसरा त्या दिशेने जातो पाहतो तर काही कुत्र्यांनी त्याच्या परिवारावर हल्ला केलेला असतो आणि त्यामध्ये तो परिवाराला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी झालेला असतो.
दुसरा वाघ त्या कुत्र्यांना केळीची साल फाडल्यासारखं फाडतो आणि घरी जातो. त्याचा मुलगा त्याला विचारतो "पप्पा तो आता तुमचा मित्र नाही तुमची भांडणं झाली, मग तुम्ही त्याच्या मदतीला का धावून गेला?".
वाघ म्हणतो, "बाळा मैत्री एवढी पण कमजोर असू नये की कुत्र्यांना पण ती बळ देईल".
सांगायचं एवढंच,

"फालतू कारणांमुळे किंवा गैरसमजुतीमुळे वाघासारख्या मित्रांना दूर नका करू जेणेकरून कुत्र्यांना बळ येईल".
*भले समाजकारण असो किंवा राजकारण हे सूत्र लक्षात ठेवा.🙏🏻😊*

Happy पोळा

*बैलपोळा स्पेशल : स्थळ मंडई पुणे*

बाई: एक बैल द्या हो.

विक्रेता: अहो,जोडी घ्या.

बाई: नाही फक्त एकच द्या

*...एक आहे घरी...*
😉😜😜😜

या आईला काही कळतच नाही...'

' या आईला काही कळतच नाही...'

या आईला तर काही, काही कळत नाही
ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही..
झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते
इतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाही
या आईला ना काही कळतच नाही

दूध पितांना कार्टून मला, बघू देत नाही..
बाबा बघतात बातम्या त्यांना काही म्हणत नाही
सारखी सारखी घड्याळ बघते.. बसू देत नाही
बाथरूममधे ओढत नेते.. रडू देत नाही
या आईला ना काही कळतच नाही

कपडे, भांग, पावडर, शूज.. सारं करून देते
बस येईल म्हणून मला .. बाहेर खेचत नेते
उशीर झाला किती म्हणून.. भरभर येते
नमस्कार करायला लावते.. कौतुक करत नाही
या आईला ना काही कळतच नाही

शाळेमधून आल्यावरही, डबा आधी पाहते
संपवला का नाहीस शोनू... नेहमीच ओरडते
अभ्यास काय दिलाय माझा हेच पाहत बसते
मी चित्रं काढलेलं... लक्ष देत नाही
या आईला ना काही कळतच नाही

होमवर्क..खाणं, क्राफ्ट, डायरी शोधून घेते
मला मात्र बीनची गंमत आठवत असते
लक्ष कुठंय विचारते.. धपाटाही देते
तिच्या कसं लक्षात येतं कळतच नाही
या आईला ना काही कळतच नाही

दमून जाऊन झोप येते..मग मला बिलगते
तेव्हां म्हणते शोन्याला वेळ देता येत नाही
पापा घेत राहते हळूच .. अश्रू पुसून घेते
आई अशी रडलेली मला आवडत नाही
पण या आईला ना काही म्हणजे काही कळतच नाही...
😊

*ती फक्त आईच!!!

"सकाळ दोन फटके देऊन  उठवते.. ती आई

उठल्यावर आवडता नाश्ता समोर आणते.. ती आई

नाश्ता नाही होत तोच डब्याची चिंता करते.. ती आई

काय करेन ते घेउन जा म्हणताना सगळं आवडीचे करते..ती आई

पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते..ती आई

परतीची आतुरतेने वाट बघत असते..ती आई

आपण झोपत नाही तोवर जागी असते..ती आई

आणि जिच्याशिवाय आपले आयुष्यच अपुरे ती फक्त आईच... 

                  ॥आई॥

घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही
जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत नाही ,
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात,
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात....!

जीव रंगला

ती मला सोडून गेल्यनंतर मी मरणारच होतो..
.
.
.
पण
.
.
.
.
.
मग मला आठवल की तिच्या मैत्रिनिचा पण नंबर
आहे माझ्याकडे...
.
.
. .
मग तिच्यात जीव रंगला..
😂😂😂😂

आग लावणार्‍या वस्तू

पेट्रोल पंपवर पाहीले प्रत्येकजण आपल्या बायकोला पेट्रोल पंपाच्या बाहेर उतराउन पेट्रोल भरायला जात होता.
मी खुप विचार केला असे का??
😇😇😇😇
नंतर तिथला बोर्ड पाहीला आणि खुप हसलो राव
.
.
.
बोर्ड👇👇👇👇
आग🔥 लावणार्‍या वस्तु दुर ठेवाव्यात !!!
😜😜😜😜😜😜😜😜      लवकर पुढे पाठवा खरीच नवीन आहे...........

नवरा म्हणजे कोण?

*नवरा म्हणजे कोण ?*

जे आहे ते सारं
तुझंच म्हणत
सगळं
स्वतःच्या नावावर ठेवणारा!

*नवरा म्हणजे कोण?*

मी तुझा गुलाम म्हणत
सगळी कामं करवून घेणारा..

*नवरा म्हणजे कोण?*

तुझ्या हाताला
आईसारखी चव नाही
म्हणत फर्माईशी करणारा!

*नवरा म्हणजे कोण?*

तू म्हणशील तसं करु
म्हणत
अंतीम निर्णय देणारा!

*नवरा म्हणजे कोण?*

रविवारभर टी.व्हीसमोर लोळून
सुट्टी साजरी करणारा...

*नवरा म्हणजे कोण?*

स्वतःची ढेरी नजरेआड करुन
बायकोचा बांधा सुटलाय म्हणणारा!

*नवरा म्हणजे कोण*

*मी बायकोला*
*घाबरून आहे दाखवत*
*तिला शेंड्या लावायची*
*संधी शोधणारा!*

*नवरा म्हणजे कोण?*

उधळलेल्या वारुला जणू
लग्नाचा लगाम घातलेला.

*नवरा म्हणजे कोण?*

*पदरी पाडून पवित्र*
*मानून घेतलेला....*

😉 dedicated to all loving
(😜)husbands and all my lovey married sisters

पेराल तर ऊगवाल

#लोखंडाच्या एका सळीची किंमत २५० रुपये.
त्यापासुन घोड्याचे नाल बनवले तर त्याचे मुल्य होते १००० रुपये.
त्यापासुन सुया बनविल्या तर त्याचे मुल्य होते १०,००० रुपये.
त्यापासुन घड्याळाच्या बॅलन्स स्प्रिंग्ज बनविल्या तर त्याचे मुल्य होते १,००,००० रुपये.
तुम्ही स्वतः काय आहात यावर तुमचे मुल्य ठरत नाही. तर तुम्ही स्वतःला काय बनवता यावर तुमचे मुल्य ठरते..
आपण आपल्याला किती मौल्यवान बनवायचं हे आपल्याच हातात आहे.!!!
"आपण एक दाणा पेरला असता,
आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ?
धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं .
पण ईश्वरानं माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे.
आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो, हजारो दाणे देतो.
अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ?
दुःख, राग, द्वेष पेरत असेल तर निसर्गाकडून शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच रिटर्न मिळेल..,
आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असेल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून रिटर्न मिळणार यात काहीच शंका नाही!

*सावधान*

*"पेरणी चालू आहे.."*
*काय पेरायच हे आपल*
*आपणच ठरवायच*

    💐💐 *have a nice day*💐💐

मोबाईल

नवरा : अग कुठे चाललीस तू ?

बायको : दिसत नाही काय ? आंघोळीला चाललीय ते !

नवरा : अग पण मोबाईल घेऊन ?

बायको : *मग , बादली भरेपर्यंत काय करू ...............*

नवरा :😷😷😷😷😷😷

होता जिवा म्हणून वाचला शीवा

*" पैलवान जिवाजी महार "*

उमरठ हे गाव तसं ३५० वर्षांपूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव.
सुभेदार तानाजी मालुसरे यांचे हे गाव.
गावात चारचौकी वाडा होता तानाजीरावांचा.

आज गावची यात्रा भरली होती. गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती.

राजांची आणि तानाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची. मिसरूड फुटायचं व्हतं त्यावेळचे सवंगडी.

आज कुस्ती होती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची, त्याचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर.

आणि त्याच्याबरोबर लढणारा होता तो भिकाजी ढेरे. हा हिरडस मावळातला.वस्ताद होते खुद्द फुलाजी बांदल.

वास्तविक सर्व जण शिवाजी राजांना पाहायला जमणार होते आणि का नाही जमणार ??
लेकीसुना, संत सज्जन ,गाई वासरे सारे सारे सुखावले होते राजांच्या मुळे. स्वराज्य आणले होते ..!

मैदान खचाखच भरले होते. लहान मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाला.

आणि पूर्वेकडून दस्तुरखुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले.
राजीयांनी पांढरा अंगरखा घातला होता.

कृष्णा घोडीवर स्वार होते आणि कमरेला  तलवार बांधली होती. जणू सह्याद्रीचे दैवत भासत होते.

राजे खाली उतरले ..

तानाजीराव आपल्या फौजेसह राजांना भेटायला वाटेतच थांबले होते. राजांनी तानाजीरावांना मिठी मारली.

तितक्यात खबर आली की, बाजी पासलकर यांच्या गावी रात्री नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता. त्यात लखू बेरड स्वत: वाघाशी चार हात करायला गेला .

वाघाने त्याच्या पायाला जबर दुखापत केली.
मात्र वाघाला नुसत्या हाताने ठार केले लखुने.

हे ऐकून मैदान शांत झाले. खूप आशेने लोक कुस्त्या पाहायला मैलोन् मैल आले होते.

आता भिकाजीला १० शेर वजनाचे कडे आयते बक्षीस मिळणार होते तेही राजांच्या हस्ते

'' मंडळी, लखू बेरडाने काल नुसत्या हाताने वाघाला ठार केले ,पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. म्हणून तो आज लढू शकत नाही.

या गावात असा कोण आहे का जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल ?असेल तर समोर या.''

ही घोषणा ऐकून मैदानाच्या पश्चिमेकडे कुजबूज सुरु झाली.

एक भाल्यासारखा उंचापुरा रांगडा गडी कपडे काढून लांघ चढवून मैदानात येत होता. सर्व लोक जोरात ओरडत होते त्याला पाहून.
राजे सर्व पाहत होते.

तितक्यात कोणीतरी किंचाळला...

''आरं आला रं जिवा महार आला ''
राजांनी चौकशी केली तानाजीरावांपाशी ..
तानाजी म्हणाले, ''राजं , ह्यो जिवाजी ,आपल्या हिकडचाच हाय, कुस्तीत लय भारी पवित्रा हाय याचा. दांडपट्टा तर लय चोख..फक्त परिस्थती नाय ..याचं वडील आपल्या थोरल्या महाराजान्सागट होतं..

निजामशाहीचा दंगा झाला तवा ह्येच्या बाचा उजवा पाय निकामी झाला..तेनच याला तयार केलाय."
राजांच्या चेहर्‍यावर एक तेज आले होते.

कुस्तीची सलामी झडली .

भिकाजी ने ठोक्यावर ठोके टाकून जिवाला नमवण्याचा प्रयत्न केला ,पण जिवाजी पण तितक्याच ताकतीने तो चुकवत होता. डाव-प्रतिडाव करत एक अर्धा तास गेला.

भिकाजीने उसन्या अवसानाने पळत येवून पटात शिरायचा प्रयत्न केला ,पण सावध जिवाने फिरवून बाहेरची टांग लावली...भिकाजी अक्षरक्ष ५-६ फुट उडून पाठीवर पालथा झाला.

सगळे प्रेक्षक वेड्यासारखे आत घुसले. जिवाला अक्षरशः डोक्यावर घेवून नाचू लागले.
तितक्यात शिंगे-करणे गरजू लागली. खुद्द राजे येत होते.

पटापटा सर्व बाजूला झाले.
राजीयांनी हासत हासत जिवाला मिठीच मारली. मनात काय राजकारण होते माहीत नव्हते; मात्र राजे जाम खुश झाले होते.
राजांनी १० शेराचे सोन्याचे कडे जिवाला बक्षीस दिले..आणि विचारले..

"जिवा काय करतोस ??"
जिवा उद्गारला ,'' काय नाय, वरातीत पट्टा फिरवतो, दंगलीत कुस्त्या खेळतो.''

राजे हसले आणि म्हणाले ..''येशील आमच्या सोबत ?....
पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची.....फक्त गानिमांच्यासोबत..!!
आहे कबूल ..??"

जिवा हसला...होकारार्थी मान हलवून त्याने मुजरा केला.

आणि हाच तो जिवाजीराजे महार ज्याने अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवून राजांचा प्राण वाचवला.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
  आज जिवाजी महार यांची  ३०६ वी  पुण्यतिथी. जिवाजी महार यांच्या पराक्रमास मानाचा मुजरा ...!!!  

म्हणतात ना *होता जिवा, म्हणून वाचला शिवा*                                                                    
🙏 जय जिवाजी जय शिवाजी 🙏

दही हंडी SMS 2017

*दहीहंडी* हा *वेड्या* लोकांचा खेळ आहे अस काही *शहाणी* माणसं बोलतात, आणि हाच *वेड्यांचा* खेळ बघण्यासाठी हीच *शहाणी* माणसं तासनतास उभी राहतात...!!

#जय गोविंदा, #जय गोपाळा!!😍✌

गणेश मूर्ती आगमन सोहळा २०१७ | Ganesh Murti Agaman Sohla 2017 Mumbai

Ganpati Aagman Sohla Mumbai 2017 | Chinchpoklicha Chintamani | Fort Raja | Antop hill Raja


अँटॉप हिल चा राजा आगमन सोहळा २०१७ | Antop Hill Raja Vighnharta Agaman Sohla 2017



फोर्ट चा राजा आगमन २०१७ | Fort Raja Agaman 2017


कुलाब्याचा सम्राट - आगमन २०१७ | Kulaba Samrat Aagman 2017 | Shri Sidhhi Saikrupa Mandal

चिंचपोकळीचा राजा चिंतामणी आगमन २०१७ | Chinchpoklicha Chintamani Aagman 2017


खेतवाडीचा विघ्णहर्ता आगमन २०१७ | Khetvadicha Vighnharta Aagman 2017



चंदनवाडीचा राजा आगमन २०१७ | Chandanvadicha Raja Aagman 2017 

गाजर आणि गजरा

बायकोला *गजरे* हवे होते...

तिनं मेसेज पाठवला इंग्रजीत....

Yetana 5 Gajre gheun ya...

तो येतांना 5 *गाजरं* घेऊन आला...

उपाशी झोपला
काय चुकल बिच्याऱ्याच ..??
😏🤔😒

म्हणून मेसेज मराठीतच टाईप करा. 😜😜😜

*"जसे कर्म, तसे फळ."*

कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?

        एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?"
       या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो.
      " असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली.
       सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले.
        जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे.
       या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले.
       भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या.
       एका विहरीभोवती चार विहीरी होत्या.
       चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे.
       पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती.
       हे पाहून भीम चक्रावून गेला.
      नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे.
       जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली.
       पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते.
      खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले.
      तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते.
      हे पाहून नकूल गोंधळून गेला.
      सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली.
      ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली.
      यावेळी सहदेवही चकीत झाला.
      या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला.
      श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला.
     "कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती.
      कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील.
      श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही.
      कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले.
       कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले."

       🙏राम कृष्ण हरी🙏

     *"जसे कर्म, तसे फळ."*

*"कितीही विरोध होऊदेत, चांगल्या व योग्य गोष्टींनाच आपला पाठींबा द्या."*🌹💐

महापुरुष साधू

बरीच वर्षांपासून ह्या नालायक पाकिस्तानच्या आणि चिनच्या सिमारेषेवरून कुरघोड्या चालू आहेत... त्यांना भारताच्या ताकदिचा अंदाज नाही अजून

दारू गोळा नसला तरी भारता कडे
पावला पावला वर सिद्ध महापुरूष,
साधु,
करणी,
भानामती,
चेटूक करणारे मांत्रिक - तांत्रिक आहेत
जे पाकिस्तान व चीन ला दारू गोळ्या शिवाय जाळून भस्म करतील ...!
*ज्यांना विश्वास बसत नाही त्यांनी कुंभमेळा जरूर बघावा ...!*

उगाच नाही सरकार  कुंभमेळ्या वर *३३ हजार करोड* खर्च करत

Husband Wife

प्रिय मित्रांनो, लग्न होणार
असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख
वाचवा आणि आणि कुठेतरी सांभाळून सेव्ह करून ठेवा परत
वाचण्यासाठी.....:

'बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी,
चारचौघींत
उठून दिसावी' अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत
तिने 'गृहकृत्यदक्ष' आणि 'आदर्श सून' असणंही मस्ट असतं. पण,
तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भावभावना,
इच्छा-
आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे मात्र
या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं, नवऱ्याचा बायकोकडे
पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा...

- उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल,
त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे.

- ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल, तुझ्याएवढाच पगार कमावत
असेल.

- तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं
असतील, आवडी असतील,

- तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल,
अगदी तुझ्यासारखंच किंवा तुझ्या बहिणीसारखं..

- तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून
कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पधेर्च्या युगात पुढे
जाण्यासाठी धडपडत असेल, अगदी तुझ्यासारखीच!

- तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं आई, बाबा, बहीण,
भाऊ यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात घालवली असतील,

- आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर, प्रेमाची माणसं
यांना दूर करून ती तुझं घरं, तुझं कुटुंब,
तुमच्या रितीभाती स्वीकारायला आली असेल.

- पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक
करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल

- नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले असताना ती मात्र
सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी,
अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असेल.

- सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात
द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं असावं
अशी अपेक्षा असेल,

- तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन पाळताना उशीर
होत
असेल,

- तीसुद्धा कंटाळली असेल, कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्तच,
तरीही तिने तक्रारीचा सूर लावू नये असंच तुम्ही म्हणाल.

- नोकर, स्वयंपाकी, बायको,
यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही आणि त्य
काय अपेक्षा आहेत हेदेखील शिकण्याचा ती प्रयत्न करत
राहील...

- तीसुद्धा थकते, कंटाळते पण सतत टुमणं लावू नये
आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये
या अपेक्षाही तिला माहिती असतात.

- तिचा स्वत:चा कंपू असतो, त्यात मित्रंही असतात
आणि तिच्या ऑफिसमधले पुरुष सहकारीही तरीही ईर्ष्या,
अनावश्यक स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या भावनेने तुमच्या मनात
घर करू नये म्हणून ती बालमित्रांपासूनही दूर राहते.

- कदाचित तिलाही लेट नाइट पाटीर्त जायला, धमाल
करायला आवडत असेल, पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून तू
सांगितलेलं नसतानाही ती तसं करत नाही.

मित्रानो, आपल्या या अनोळखी घरात केवळ आपण एकच
तिच्या ओळखीचा, जवळचा असतो, त्यामुळे आपली मदत,
संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे अण्डरस्टॅण्डिंग
आणि प्रेम मिळावं अशी तिची अपेक्षा असेल पण अनेक जण हे
समजूनच घेत नाहीत...
एक सांगू, स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल,
तुम्ही मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातलं
सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल....