Showing posts with label Nice Thoughts. Show all posts
Showing posts with label Nice Thoughts. Show all posts

वाचन

📖 *वाचन का आवश्यक आहे ?* 📖

📚एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा !

📘 श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नसुन वाचन करणारेच श्रीमंत होतात जसे शरीरासाठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्‍यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो.

📙 जगाचा आतापर्यंत जो विकास झाला आहे तो वाचनामुळे आणि जगाचा आता र्‍हास होणार आहे तो टी.व्ही मोबाईलमुळे.

📒 पुस्तक वाचनारा माणूस कधीही व्यसन करत नाही आणि टी.व्ही मोबाईल हेच मुळी व्यसन आहे.

📕 वाचनामुळे ज्ञानात भर पडते, टि.व्ही मोबाईल मुळे माणूस Adicted होतो.

📔 टी.व्ही साठी मोबाईल साठी नेटवर्क लागते, वाचनासाठी फक्त माणूस जागेवर लागतो.

📓 वाचन करणारी माणसं मनाने विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात.

📚वाचन करणारा माणूस शांत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब वाढणे, हृदय विकाराचा झटका येणे अशा गोष्टी संभवत नाहीत. या उलट जास्त टी.व्ही. मोबाईल वापरणारेच विविध रोगांना बळी पडत असल्याचे समोर येत आहे.

📖 टी.व्ही मोबाईलमुळे मन शांतीचा भंग होतो तर वाचनामुळे भंग झालेली मनस्थिती शांत होते.

📔
वाचन करणारा माणूस लवकर झोपतो लवकर उठतो. टी.व्ही मोबाईल चक्कर मध्ये अडकणारे उशिरा झोपतात नी उशिराच उठतात. परिणामी शरीर संपदेसह श्रीमंतीही नष्ट होते. लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य लाभे.. अशी एक म्हण प्रचलित आहे.

📓 वाचन करणारा पुढे उद्योजक होतो तर वाचन न करणारा नोकरीवरच थांबतो.

📕 वाचन करणारा चार तासच काम करून करोडपती होतो तर वाचन टाळणारा बारा तास काम करून गरिबीतच मरतो.

📘 काही महाभाग तर नोकरी लागली की, जगातील मी एकटाच सिकंदर, आता मलाच सारे काही कळते, अशा  नंदनवनात वावरून वाचनच बंद करतात.

📕 वाचनामुळे माणूस नम्र होतो तर टी.व्ही मुळे माणूस भांडखोर नी मोबाईलमुळे आत्मकेंद्री होतो.

📚 जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते तेच खरे पुस्तक आणि जे कृती करायला लावते तेच खरे वाचन.

📒 आपल्या आयुष्यात दोन गोष्टींचा प्रभाव पडतो एक मित्र आणि एक पुस्तक, पुस्तकालाच आपला मित्र बनवा.

📙 टी.व्ही बघणारे प्रवास करतात, तर वाचन करणारे ध्येय गाठतात. टी.व्ही मोबाईलमुळे थकवा येतो तर वाचनामुळे तरतरी.

📚 जिथे वाचन होते तेथे विचार होतात आणि जेथे विचारांचे स्वातंत्र्य नाही तेथे गुलामी येते. वाचनामुळे ध्येय ठरवीता येते आणि गाठताही येते.

📕 तुमच्या ध्येयावरून तुमची लायकी पारखली जाते आणि तुम्ही किती मोठे ध्येय ठरविता ते तुम्ही कोणते पुस्तक वाचता यावर अवलंबून असते.

📓 ज्यांना आयुष्यात कोणतेही ध्येय नसतं तेच लोक पुस्तक वाचत नाहीत आणि ध्येयाविना जगणे म्हणजे बिगर पत्त्याचे पत्र पोस्टात टाकणे होय. पुस्तक चाळणे वेगळे आणि वाचनं वेगळं.

📖 *जगात जेवढे  लोक उपास मारीने मेलेत त्यापेक्षा जास्त लोक पुस्तक वाचन न झाल्यामुळे मेलेत. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातुन संपत्ती निर्माण होत असते.*

📖📘📚📓📔📕📙

निवांत वाचा. खरोखर छान वाटेल...😊

🔴 कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा.

🔴 नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ...बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही.
कारण..पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते,विजांच्या कडकडाटामुळे नाही..                                       

 🔴आणि वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं..डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!! निवड आपली आहे.."                                  

🔴कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

🔴डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

🔴जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन..!

🔴मोर नाचताना सुद्धा रडतो...आणि...राजहंस मरताना सुद्धा गातो...दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि
सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.यालाच जीवन म्हणतात.

🔴किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही. 😊😊 😊😊 म्हणून नेहमी आनंदी राहा🤗🤗🤗🤗

*मला हि पोस्ट आवडली म्हणुन मि खास लोकांना पाठवत आहे.."      "       🤗🤗🤗🤗🤗

"आयुष्यात कितीही चांगली कर्म करा"...
*"कौतुक हे स्मशानातच होतं".....!!!

मी अणि मी

लेखक कोण आहे माहीत नाही , परंतु खूप मस्त लिहिलं आहे .

*जगण्याचं सूत्र चुकतंय का?* 

         भाऊ काय बहीण काय 

         नुसता फापट पसारा,  

         कोण कोणाला विचारतंय 

         कुणालाही विचारा ...

कुणी कोणाकडे जाईना

कुणी कुणाकडे येईना, 

जगलात काय मेलात काय 

माया कुणाला येईना ...

         संवेदनशीलता आता 

         फारशी कुठं दिसत नाही,  

         बैठकीत किंवा ओसरीवर 

         गप्पाची मैफिल बसत नाही ...

पॅकेज, इनक्रिमेंट, सॅलरी 

इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड,  

यातच हल्ली माणसाचा 

होत आहे The End ...

         Luxury मधे लोळतांना 

         फाटकं गाव नको वाटतं,  

         जवळचं नातं असलं तरी 

         सांगायलाही नको वाटतं ...

उच्च शिक्षित असूनही 

माणूस आज Mad वाटतं,  

इंटेरियर केलेल्या घरामधे 

लुगडं, धोतर Odd वाटतं..  

         सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे

         कसे काय Posh असतील?  

         पार्लर मधून आणल्या सारखे 

         चिकणे चोपडे कसे दिसतील? 

उन्हा तान्हात तळणारी 

माणसं काळी पडणारच,  

गरिबीनं गांजल्यावर 

चेहऱ्याचा रंग उडणारच ...

         कुरूप ते नाहीत 

         कुरूप तू झालास,  

         प्रेम नात्यावर करायचं सोडून

         दिसण्याला भुलून गेलास ..  

..

         पात्र कितीही मोठं झालं 

         तरी गंगेचं मूळ विसरू नये,  

         सुख असो का दुःख असो 

         आपल्या माणसाला विसरू नये.  

दिसण्यावर प्रेम करू नकोस 

आपलं समजून जवळ घे,  

एरव्ही नाही आलास तरी 

दिवाळीला तरी घरी ये..  

      कॉम्प्युटरच्या भाषा खूप शिकलास 

      माणसावर प्रेम करायचं शिक,  

      नाहीतर मानसिक आरोग्यासाठी 

      दारोदार मागत फिरशील भीक ...

दुसऱ्याचा  छळ करून 

तुम्ही सुखी होणार नाही,  

पॅकेज कितीही मोठं असू द्या 

जगण्यात मजा येणार नाही. .  

       जग जवळ करतांना 

       आपली माणसं तोडू नका,  

       अमृताच्या घड्याला 

       अविचाराने लाथाडू नका..!

*मी का बोलू?*

*मी का फोन करू?*

*मी का कमीपणा घेऊ?*

*मी का नमते घेऊ?*

*मी का नेहमी समजून घ्यायचं?*

*मी काय कमी आहे का?"*

असे बरेच सारे *"मी"* आहेत ,

जे आयुष्यात विष कालवतात ...

म्हणून , अरे अतिशिकलेल्या माणसा *मी पणा* सोड नि

नाती जोड़ .🙏🏻🙏🏻🙏🏻 कोणी लिहिलय माहीत नाही पण ........ प्रयत्न करतोय मी पणा कमी करणेचा बघा तुम्हाला ही जमतंय का ? 🙏🏻👍🏻

🚶🏾हळू हळू वाचा खुप आनंद घ्याल ........

🚶🏾👌संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात......✍

🚶🏾👌आपण फुशारकीने इतरांना सांगतो नेहमी खुष राहत जा पण त्याचा रस्ता पण दाखवा...✍

🚶🏾👌काल एक व्यक्ती भाकरी मागून घेवून गेला आणि करोडोंचे आशिर्वाद देवून गेला, माहितीच पडत नव्हतं कि गरीब तो होता का मी.....✍

🚶🏾👌आयुष्याचं गाठोड सोबत बांधून बसलाय अनाडी जे घेवून जायच आहे ते कमवलच नाही.....✍

🚶🏾👌मी त्या नशीबाचे सगळ्यात आवडीच खेळणं आहे, जे रोज मला जोडते ते परत तोडून टाकण्यासाठी...✍

🚶🏾👌ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो वार कोणी आपल्यानेच केला आहे...✍

🚶🏾👌लहानपण हे कमालीच होतं, खेळता खेळता भले टेरेसवर झोपा किंवा जमिनीवर झोपा पण डोळे अंथरूणावरच उघडायचे....✍

🚶🏾👌हरवलोय आपण स्वतः पण देवाला शोधत बसलोय.......✍

🚶🏾👌गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा.......✍

🚶🏾👌आयुष्याची पण गजब खेळी आहे....सावरली तर "जन्नत"....नाहीतर फक्त तमाशाच आहे.....✍

🚶🏾👌आनंद हा नशीबातच असतो...कारण आरशामध्ये बघून सगळेच हसतात.....✍

🚶🏾👌आयुष्यपण व्हिडिओ गेम सारखं झाल आहे, एक लेवल पार केली तर पुढची लेवल ही त्याहीपेक्षा मुश्कील येते......✍

🚶🏾👌एवढी आवड तर पैसे मिळवायला पण लागत नाही जेवढी लहापणीचे फोटो पाहिल्यानंतर परत लहान व्हावस वाटत....✍

🚶🏾👌नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....✍

🚶🏾👌दुसऱ्या ला संपवण्याच्या प्रयत्नात स्वतः संपून जाल
त्या मुळे स्वतः च्या प्रगती कडे लक्ष दया!!!.....✍

🚶🏾👌जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं.
आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी......✍

🚶🏾👌क्षेत्र कोणतेही असो...
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही
आणि कष्ट प्रामाणिक असले....
की यशालाही पर्याय नाही..✍🏻

🚶🏾👌केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं....✍

🚶🏾👌"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे...,
लोकांच काय लोक " चुका"
तर "देवात" पण काढतात.....✍

🚶🏾👌सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,वेळ वाया जाईल....
हि दुनिया मतलबी झाली आहे,त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा,चांगली वेळ येईल....✍

🚶🏾👌जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.....✍

🚶🏾👌विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही...!!
तुम्ही चांगले कार्य करु लागले की विरोधक आपोआप तयार होतात...!!✍

🚶🏾👌कर्तृत्ववान व्यक्तींचा पराक्रम बघितला जात नाही...,
पण त्याचं चाक जमिनीत कधी अडकतय याकडे मात्र सर्वाचे लक्ष असते.....✍

🚶🏾👌एक मात्र नक्की खंर आहे की,चांगल्या रस्त्याला गतिरोधक,आणि......चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच.....✍

🚶🏾👌चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.....✍

🚶🏾👌एक सत्य  . . . 👇"नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते ".....✍

🚶🏾👌असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.....✍

🚶🏾👌"जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही.".....✍

🚶🏾👌क‍‍‌‌‌‍धी‍ही मिठासारखं आयुष्य जगु नका,की लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता वापर करुन घेतील.....✍

🚶🏾👌आयुष्यात स्वत:ला कधी उध्वस्त होउ देऊ नका
          कारण
लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाही।

पु. ल. म्हणतात -

खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो...

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो...बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो...

माणूस अपयशाला भीत नाही...अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते...

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही, त्याचा त्रास होतो...
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो...

सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही...

कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे...

रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते... तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं...

आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय...

ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते...

आयुष्य फार सुंदर आहे...
ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे...
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे...💞💞
🌺🌺🌺🌺
🌹🌺🙏🏻शुभ सकाळ🌹🌺🙏🏻

✊ झाकलेल्या मुठीतून वाळूचा⌛कण निसटावा तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि...
आपण उगीच भ्रमात आहोत कि 👉आपण वर्षा वर्षाने मोठ होत चाललोय...

❤प्रेम "माणसावर" करा त्याच्या "सवयीवर" नाही… .
😔 "नाराज" व्हा त्याच्या बोलण्यावर पण "त्याच्यावर" नाही… .
�विसरा" त्याच्या "चुका" पण त्याला नाही… .
कारण "माणुसकी" पेक्षा मोठ काहीच नाही…
      😴शुभ रात्री😴

जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ
द्यायच्या नाहीत...........
*अन्नाचा कण*
आणि
*आनंदाचा क्षण*
नेहमी हसत रहा..😊☺☺☺
💞💞  💞💞
आयुष्यात 🏡 🚕 💵 *संपत्ति* कमी मिळाली तरी चालेल...
पण  *नाती* 👫 अशी मिळवा की कोणाला त्याची किम्मत पण करता येणार नाही.........           *                      🌺🌺Good  mrning 🌺🌺*

*धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की*:,
*जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं*,
*एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल*...!!
🍁🌾🌷🌸🌹

*कसं जगावं..?  🙄🙄🙄*  😬😜

*मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती. त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही..🤕🤕*
*श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबर करत असणार.. त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं..? प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब-राब राबतोय. झालो का श्रीमंत..?👳🏼👳🏼*

*पैशाच्या मागे धावू लागला की म्हणतात, पैशाची हाव सुटली आहे.. 💵💴🏃🏽*
*पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात, त्याच्या जीवनात काही महत्वाकांक्षाच नाही..! 😮😮*

*नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले, तर कवडी चुंबक म्हणतात.*
*चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच, उधळ्या म्हणतात.🤗🤗*

*वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही. लगेच त्याला म्हणणार, बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा..! स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात..?😴😴*

*आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात, काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा..? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं..?🚶🏼🚶🏽*

*जास्त भाविक असला तर म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव..🙂🙂*
*आणि मंदीरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात.👺👺*

*तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात, अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता. 🗣🗣*
*दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील, अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक..?💂🏼💂🏼*

*मनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ🕷 म्हणतात. जाड असला की हत्ती 🐘 म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.🙁🙁 जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ असल्या माणसांमुळेच पडतो..!👹👹*

*सहज कोणाला मदत केली तर म्हणतात, यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार.*
*नाही मदत केली तर म्हणणार, साधी माणूसकी नाही बघा..😱😱*

*सरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात, अंगात थोडातरी स्वार्थ हवा.👨🏻👨🏻*
*स्वार्थी असलाच तर म्हणतात, माणसाचा स्वभाव सरळ हवा. स्वार्थाची संपत्ती काय कामाची..?🤓🤓*

*खेळकर स्वभाव असला तर म्हणतात, आचरट आहे. परिस्थितीचं गांभीर्य नाही. 😏😏*
*आणि गंभीर असणंही त्यांना रुचत नाही. म्हणतात, हसण्याची अलर्जी आहे याला. कोण जवळ येईल याच्या..!😂😂*

*तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते. म्हणतात, आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.💁🏼💁🏼*
*अयशस्वी झालात तर म्हणणार, आमचं ऐकलं नाही. मग भोगा कर्माची फळं..!🙇🏻🙇🏼*

*लोकांचं काय घेऊन बसलात..? काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची त्यांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं..?*  *जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं..?🤔🤔*

*मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय..*
*फिदीफिदी हसतील ते हसू देत की.. बोटं मोडीत बसतील ते बसू देत की..!*
*आपण का शरमून जायचं..?*
*कशासाठी वरमून जायचं?*
*कशासाठी भयाने ग्रासून जायचं..?*
*फुलायच्या प्रत्येक क्षणी कशाला* *नासून जायचं..?*
*आपलं जीवन आपण ठरवायचं, कसं जगायचं..*
*कण्हत-कण्हत कि गाणं म्हणत, हे आपणच ठरवायचं..!* plz read

ज्या माणसामध्ये दुसऱ्याला मोठे होताना बघायचे सामर्थ्य आणि
दुसऱ्यालामोठे करायची उर्मी असते तीच माणसे खऱ्या अर्थाने
खुप मोठ्या उंचीवर जाऊन यशाचे शिखर सर करतात.
🍃 शुभ रात्री 🍃

हृदयाला स्पर्श करणारी चार्ली चॅप्लिन ची तीन वाक्ये........
🍃🌹१) या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही, तुमचं दु:ख सुद्धा.
🍃🌹२)मला पावसात चालायला आवडतं कारण पावसांत माझे अश्रु कोणीच पाहू शकंत नाही.
🍃🌹३)ज्या दिवशी आपण हसलो नाही,तो दिवस आप ल्या आयुष्यातील फुकट गेलेला दिवस.

"कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी
खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे
सांगता येत नाही."
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
अन्...
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत...!"  
Duryodhan & Rahul Gandhi - both without talent. but yet wanted to be rulers on the principle of birth-right.

♻Bhishma & Advani -  Never crowned. got respect & yet became helpless at the end of their lives.

♻Arjun & Narendra - Both talented. reached the highest position due to being on the side of dharma. but realise how difficult it is to follow and practice.

♻Karna & Manmohan Singh - Both intelligent. but never reached anywhere being on the side of adharma.

♻Shakuni & Kejriwal - Both never fought a war, just played dirty tricks.

♻Dhritrashtra & Sonia - Both were blind for love of their sons.

♻And Last - Krishna And Abdul Kalam - We celebrate both of them but do not follow what they taught and preached.

That is Mahabharat & This is Bharat.

सगळीच स्वप्न पुर्ण
होत नसतात ती फक्त
पहायची असतात…

कधी कधी त्यात रंग
भरायचे असतात पण
स्वप्न पुर्ण झालं नाही
तर दुखी व्हायच नसतं..

रंग उडाले म्हणुन चित्र
फाडायचं नसतं फक्त
लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत..

☆→शुभ प्रभात←☆

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मला सर्वात आवडलेल विधान....
  माझं भांडण सर्वांशी आहे पण शत्रुत्व कुणाशीचं नाही....
  खर आहे..मलाही असंच वाटतंय मतभेद जरुर असावेत पण मनभेद असता कामा नयेत...
    एखाद्याशी वाद घालावा पण त्याला जखम होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे.....
   विनाकारण अहंकार बाळगुन जगू नये....शेवटी आठ मण लाकडे किंवा चार गज जमीन हाच या जीवनाचा शेवट आहे हे कायम लक्षात ठेवावे....
   म्रुत्यु हे सुंदर आणि शाश्वत वास्तव आहे याचे कायम भान राखावे..म्हणून कुनीतरी लिहलय...
आयेगा खाली जायेगा खाली...
कभी न भरेगी ये तेरी झोली...
काम ना आयेगी बंगला-गाडी और हवेली..
इसी हवेलीसे निकल जायेगी एक दिन तेरी डोली....
चला सर्वांसाठी जगुया....माणूस बनुया आणि माणुसकी जपुया...

💐💐💐🏻शुभ सकाळ💐💐💐

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "वाट" बघतात...
        अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "प्रयत्न" करतात...
        पण "सवोॅतम" गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या "प्रयत्नांवर" अतूट विश्वास ठेवतात...
👉 "आयुष्य" अवघड आहे पण, अशक्य नाही...!!

प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे ,
दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका
आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा कारण समर्थ सांगून गेलेत......!    
!! जगी सर्व सुखी असा कोण आहे !!
!! विचारी मना तूच शोधुनी पाहे !!

         🌹शुभ सकाळ🌹

" नदी मध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाहि ,
जीव तेंव्हाच जातो जेंव्हा पोहता येत नाहि ......
.
परिस्थिती कधीच समस्या बनत नाहि ,
समस्या तेंव्हाच बनते , जेव्हा आपल्याला ती परिस्थिती हताळता येत नाहि"........
        💐💐 शुभ सकाळ💐💐

हारण्याची पर्वा कधी केली नाही,
जिंकन्याचा मोह ही केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करने मी सोडणार नाही..
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण..
एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
  आणि ती असते..
      "आपलं आयुष्य"..
म्हणूनच..
मनसोक्त जगा !!!

🍃🍃🌺🍃🍃🌺🍃🍃🌺🍃🍃
जीवनात जे काही कराल,
              ते पूर्ण समर्पण करून करा,
भक्ति असावी हनुमंतासारखी
             प्रतिक्षा असावी शबरी सारखी,
प्रेम असावं मिराबाई सारखं,
             शिष्य असावं अर्जुनासारखं,
आणि मित्र असावं तर,
        प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णासारखं.
🍃🍃🌺🍃🍃🌺🍃🍃🌺🍃🍃

       🌹शुभ प्रभात. शुभ दिवस.🌹

*भगवान बुद्धाचे अतिशय महत्त्वाचे वाक्ये:-*
🌝शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा
कर्तृत्ववान होय.
🌝 स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च
करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही.
🌝 प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु
आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची
अपेक्षा करू नका.
🌝 जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा
आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म
करण्याची वेळ आली आहे.
🌝 इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं
पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त
सुखी आणि समाधानी होऊ शकता.
🌝 तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक
कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही
तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार
नाही.
🌝 जीवनात एकदा ध्येय निर्धारित
केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,कारण
पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास
घडवीत नसतात.
🌝 काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा
ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता
.त्यात सर्वोचस्थानी पोहोचा.
🌝 स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा
असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक
बाबिंचेच चिंतन सतत केले पाहिजे.
🌝 घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत
नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त
केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
🌝आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट
गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला
सुरवात केली की आपोआप आयुष्यात
चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.
🌝 चुका सुधारण्यासाठी ज्याची
स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू
शकत नाही.
🌝 जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं
अस काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जे
काहीच केले नाही अस काही तरी करण्याची
तयारी ठेवा.
🌝बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ
शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन
बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू
शकत नाही. 🌹 🌹