*भगवान बुद्धाचे अतिशय महत्त्वाचे वाक्ये:-*
🌝शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा
कर्तृत्ववान होय.
🌝 स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च
करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही.
🌝 प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु
आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची
अपेक्षा करू नका.
🌝 जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा
आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म
करण्याची वेळ आली आहे.
🌝 इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं
पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त
सुखी आणि समाधानी होऊ शकता.
🌝 तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक
कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही
तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार
नाही.
🌝 जीवनात एकदा ध्येय निर्धारित
केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,कारण
पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास
घडवीत नसतात.
🌝 काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा
ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता
.त्यात सर्वोचस्थानी पोहोचा.
🌝 स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा
असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक
बाबिंचेच चिंतन सतत केले पाहिजे.
🌝 घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत
नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त
केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
🌝आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट
गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला
सुरवात केली की आपोआप आयुष्यात
चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.
🌝 चुका सुधारण्यासाठी ज्याची
स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू
शकत नाही.
🌝 जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं
अस काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जे
काहीच केले नाही अस काही तरी करण्याची
तयारी ठेवा.
🌝बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ
शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन
बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू
शकत नाही. 🌹 🌹

No comments:

Post a Comment