व्हियेतनाम या लहानग्या देशानं अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला नमवलं होतं.
.
.
जवळपास वीस वर्षे चाललेल्या या युद्धात अमेरिका पराजित झाली होती.

विजयानंतर व्हियेतनामच्या राष्ट्राध्यक्षांना एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला.
साहजिकच तो यु्द्ध कसे जिंकलात हाच असणार! किंवा
अमेरिकेला कसं नमवलं हाच असणार!
त्यावर दिलेलं हे उत्तर वाचा...
..
"मुळात अमेरिका बलाढ्य देश. मात्र त्याच बलाढ्य देशाला नमवण्यासाठी
मी एका महान राजाचं चरित्र वाचलं होतं. त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून मी युद्धनीतिचा वापर केला आणि सहज विजय संपादन केला...
पुढे पत्रकारानं विचारलं की, कोण होता तो महान राजा???

मित्रांनो जेव्हा मी वाचलं तेव्हा माझीही छाती चांगलीच फुगली, जशी आता तुमची फुगेल..

तर या प्रश्नावर व्हियेतनामचे राष्ट्राध्यक्ष जागेवर उभे राहिले
आणि "छत्रपती शिवाजी महाराज" असं नाव घेतलं.
नाव घेत असताना त्यांच्या डोळ्यांत एक वेगळेच तेज दिसत होतं!

पुढे ते म्हणाले की, असा राजा जर आमच्या देशात जन्माला आला असता तर आज आम्ही जगावर राज्य केलं असतं.

काही वर्षांनंतर या राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झाला आणि त्यांनी आपल्या समाधीवर "शिवाजी महाराजांचा एक मावळा समाधीस्थ झाला" असं लिहून ठेवलंय....

कालांतराने व्हियेतनामच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचा दौरा केला. ठरलेल्या राजकीय कार्यक्रमानुसार त्यांना लाल किल्ला आणि गांधीजींची समाधी दाखवण्यात आली.

मात्र हे दाखवत असताना त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे हे विचारलं.
तेव्हा...
तेव्हा भारतीय सरकार थबकलं आणि रायगड असा उल्लेख केला...

परराष्ट्रमंत्री रायगडावर आल्या आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं.

समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी रायगडावरची माती उचलली आणि आपल्या बॅगमध्ये भरली.
यावर पत्रकारांनी या मातीमागचं कारण विचारलं. त्यावर मंत्री महोदय म्हणाल्या की,

"ही माती शूरांची आहे. या मातीत महान राजा जन्माला आला. हिच माती मी माझ्या देशाच्या मातीत मिसळणार आहे. जेणेकरून आमच्या  देशात असे शूर वीर पुरुष जन्माला येवोत.."

माझा राजा हा फक्त महाराष्ट्राला हेवा वाटावा असा नसून संपूर्ण जगाला हेवा वाटावा असाच आहे!!!

छत्रपती शिवाजी महाराज की जय!!

अपेक्षा व्यक्त करतो की, आपण ही पोस्ट मोठ्या अभिमानाने संपूर्ण महाराष्ट्रभर शेअर करावी..!

No comments:

Post a Comment