रक्त शेवटी लाल

नमस्कारचे सुद्धा आता
तुकडे पडलेत...
'जय भीम','  'जय जिजाऊ',  जय भगवान', 'जय मल्हार','जय रोहिदास', 'जय राणा'...

सकाळ सुद्धा आता
*'जात'* घेऊनच उगवते...
'शिवसकाळ', 'भिमसकाळ',
'लहूसकाळ'...

समाज परिवर्तनाचा ध्यास घेऊन, हातात लेखणीची मशाल घेऊन, क्रांतीची भाषा करणारे कवी सुद्धा आता *'जात'* सांगून टाकतात...
'मल्हारकवी'  'शिवकवी', 'भीमकवी', ...

वादळं सुद्धा आता
*'जात'* घेऊन येतात '
हिरवं वादळं', 'भगवं वादळं', 'निळं वादळं', 'पिवळं वादळं'...

रंगात विभागलेत आता
पाऊस, वारा, वादळं,
शहरातली दुकाने
अन्...
गावच्या वेशीसुद्धा...!

पण ...
रक्ताचा 'रंग' मात्र
अजूनही *'लालच'*..............!
😔😔😔
👍🏼👍🏼 करा यावर मात, *''मनुष्य हीच खरी आहे जात''*  ,, नाहीतर
देश  जाईल  धूळ खात ,,, या वर करा मात ,,
     *भारतीय  हीच आपली जात*

No comments:

Post a Comment