" सैराट " - जसा दिसतो तसा नाही..

       वाचा नाना पाटेकर
       यांचे मनोगत.....

कृपया चुकीचा बोध घेऊ नका.....   !

पहिली बाजू प्रेमाचा अवखळपणा , मौजमजा भले दाखवून गेली पण प्रेमाने पोट भरत नाही , त्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते जी आर्ची ने बरोबर आणलेल्या पैशापेक्षा कितीतरी मोठी होती . हे पाहणं गरजेचं आहे , बुलेट चालवणारी आर्चीची नंतरची अवस्था ही अविचाराने केलेल्या प्रेमाचंच फळ होतं , नंतर जरी ती स्थिर झाली तरी दोघांच्या कुटुंबाचे झालेले हाल हा त्यांच्या प्रेमाचाच दोष होता , राजकीय वर्तुळात वावरणा-या तिच्या वडीलांना पदोपदी मानहानी पत्करावी लागली आणि अतिशय गरीब , परश्याच्या कुटुंबाची तर वाताहात झाली , यासाठीच प्रेम करायचे असते का ? आपल्यासाठी काबाडकष्ट करणा-या , आपल्या कडून अनेक अपेक्षा ठेऊन सुखी आयुष्याची स्वप्न बघणा-या परशाच्या आईवडीलांचं कुठे चुकलं ? प्रेमासाठी जीव देण्यात शहाणपण नाही तर ज्या आईवडीलांनी आपल्या जन्मापासून आपल्यावर प्रेम केलं त्यांच्यासाठी जगावं आणि त्यांनाही सन्मानानं जगवावं ... हे सांगतो हा सैराट चित्रपट !

 सैराट....मूल/मूली फक्त त्या चित्रपटातली love story बघतात..पण त्यांच्या कुटुंबाला झालेला त्रास..त्यांची गेलेली इज्जत कोणी लक्षात घेत नाही...प्रेम 100% करा..पण वेळ आल्यावर ते घरी संगण्याची हिम्मत देखील ठेवा...घरच्यांची परवानगी घ्या.. नाही दिली तर प्रयत्न करा...पण हे पळून जाण वगेरे हे असले भंगार चाळे करू नका...ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला..लहनाच मोठ केल..एवढे वर्ष पाळल...त्या आई वडिलांना सोडून 2/3 वर्ष भेटलेल्या मुला/मूली सोबत पळून जाण योग्य नाही....

नाना पाटेकर....

No comments:

Post a Comment