व. पु. .... एक कविता...

लग्नापूर्वीचे तें गुलाबी दिवस
लग्नानंतर मात्र राहत नाही,
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.🤗

मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो..😉
आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.

आपला नवरा बैल आहे,
असं प्रत्येक बाईला वाटत असतं..
त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख
तिच्या मनात दाटत असतं 🙃

त्याचा तो गबाळा अवतार..
तिला नीट्नेटकं राहयचं असतं.
तिला चार दिवस सासूचे..😊
तर त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं.

लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ
पळत कसला, रांगत असतो,
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.😜

ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल,
असं प्रत्यक्षात घडत नाही.😃
त्याच्या स्वप्नाचे पंख लावून,
ती त्याच्या आकाशात उडत नाही.

तो गच्चीत तिला घेऊन जातो,
इंद्रधनुष्यावर चालायला..
ती सोबत पापड कुरड़या घेते,
गच्चीत वाळत घालायला.😀

त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
लखलखती शुक्राची चांदणी असते,
हिच्या डोक्यात गोडा मसाला
आणि वर्षभराची भाजणी असते.😄

आपली बायको म्हैस आहे,
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो😃

कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.

-व. पु.

प्रत्येक नवरा बायकोने वाचावी अशी धमाल विनोदी कविता.😃😃

Nice Thoughts Collection in Marathi

काही  माणसं  तशी  साधीच  असतात पण त्यांच्या  साधेपणात एक मोठेपणा आसतो ,🙏🏻
विचारात  एक  तेज असते, ,बोलण्यात  नम्रता  असते  ,🙏🏻
वागण्यात  सौजन्य  असतं आणि  ह्दयात  असतो स्नेहाचा  झरा

💞 'मन' ओळखणारयांपेक्षा 👏🏻मन जपणारी 👨‍👨‍👦‍👦 माणसं हवीत... कारण, 🤗ओळख ही क्षणभरासाठी असते तर 👏🏻जपवणूक 🤗 आयुष्यभरासाठी!!!

*वाटीभर शिरा समोर बघितला अन लक्षात आलं*. *त्यात रवा, काजू, बदाम सगळंच दिसत होतं पण* *ज्यामुळे तो शिरा गोड लागतो ती साखर कुठे* *दिसली नाही. काही अंशी आपलं एखाद्याच्या* *आयुष्यातलं अस्तित्व असच असावं*
*दिसत नसलं तरी गोडवा आणि*
*आपुलकीमुळे जीवनाला पूर्णत्व मिळत*.
               
*आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे*
*आणि वडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे.*
*जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही,*
*परंतु एक वडीलच असे आहेत* 
*की,जे आपल्या मुलाला*
*आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात.*

अशक्य जोक

*अशक्य जोक*
👇👇👇👇👇👇
                     *कहर*
😀😀😜😜😜

गुरुजी : सांग बर प्राचीन भारतात *गणित* आणि *भुमिती* किती प्रगत होती.

गंपू : श्रीमद् भगवतगीतेत पार्थ म्हणून ज्या अर्जुनाचा उल्लेख केला, त्या पार्थाचा गौरवर्णिय यवनीपासून झालेला पुत्र म्हणजेच *पार्थागोरस(पायथ्यागोरस)*..!!

हा पुत्र यवनीच्या पोटी जन्मला असल्याने त्यास सर्वजण विदेशी म्हणून हिणवू लागले.

तेव्हा अर्जुनाचा सहोदर बंधु कुंतीपुत्र कर्ण याने त्यास आश्रय दिला, कारण तोही कुंतीपुत्र असूनही उपेक्षित वर्गातील होता.

"पार्थागोरस, तू आणि मी पांडव असूनही एकाच उपेक्षित वर्गातील आहोत , तुझा नि माझा वर्ग एकच आहे".

कर्णाच्या वाक्याने *'कर्ण'* आणि *'वर्ग'* हे दोन शब्द , पायथागोरसच्या मनावर लहानपणीच कोरले गेले.

त्यामुळेच कर्णाच्या या कृतीने उपकृत होवून पायथागोरस ने कर्ण हा ईतरांपेक्षा मोठा असा सिद्धांत मांडला.

त्यातूनच पुढे कर्ण वर्ग हा इतर दोन भुजांच्या वर्गाबरोबर असतो असे मत मान्य झाले.

त्याच्या या सिद्धांताचे विचार *वर्तुळ* व्यास मुनीनी पुर्ण केल्यामुळे, वर्तुळाचा *व्यास* हा वर्तुळास दोन समान भागात विभागतो असा गणितीय सिद्धांत पुढे प्रसृत झाला.

कंस हा तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा मामा. तो गणितात कच्चा होता, देविकीच्या मुलांना मारताना त्याचे गणित चुकले आणि कृष्ण जन्म होउन मृत्यू अटळ बनला.

कृष्णाच्या हातून मोक्ष प्राप्ती होत असताना कंसाची ईच्छा प्रकट केली होती की, गणितात माझ्या नावाने कांहीतरी असावे म्हणून, कंसाच्या वधानंतर त्याचे स्मऱण असावे म्हणून गणितात ( ) *कंस* वापरतात.

यावरून प्राचीन भारतात गणित आणि भुमिती किती प्रगत होती, हे सिध्द होते.

गुरूजी ICU मध्ये आहेत.

🌼🌼  || *सुप्रभात* ||  🌼🌼

✍🏻
     *मन ओळखणारयांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत* ...' कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर *जपवणूक आयुष्यभरासाठी!*
      "" *भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल*  पण माझ्यापासून कोणाचे *नुकसान* नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो

        🌴🐾🐾🌴
🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🌹
*आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो*🌺

👉 *एच.एम.टी. (घड्याळ)*
👉 *अॅम्बेसॅडर (गाडी)*
👉 *नोकिया (मोबाइल)*
या सर्वांच्या गुणवत्तेमध्ये कोणतीच कमी नव्हती,
परंतु तरीपण हे बाजारातुन, नामशेष झाले,
कारण त्यांनी वेळेनुसार बदल करुन घेतला नाही,
त्यामुळे माणसाला वेळेनुसार आपल्य
👉 *व्यवसायात*
👉 *कामात*
👉 *स्वभावात*
बदल करत राहीले पाहिजे...!!

*UPDATE* & *UPGRADE* TIME TO TIME

Marathi Exam SMS Collection

Ganya is back

शाळेत english  चे lecture चालू असते ..
मास्तर _ :  गण्या ' it ' केव्हा वापरतात ??

गण्या _: घर बांधताना !!!!
😂😂😂😂😂



खतरनाक विनोद
गुरूजी: गन्या, हुंडा म्हणजे काय रे सांग जरा..?
गन्या : जेव्हा एखादा महापुरुष...
एखाद्या स्त्रीला आजन्म सहन करण्यासाठी  मानसिक दृष्ट्या तयार होतो तेव्हा त्याला प्रोत्साहन-भत्ता... तथा अनुदान म्हणून... जी रक्कम दिली जाते त्यालाच आपल्या मातृभाषेत हुंडा 🎁असे म्हणतात..!
😄😂😃😅
गन्याला भारतरत्न जाहीर..!
😂😃😄😅😅😄😃😂😂

कॉलेजच्या फळ्यावर एक सुविचार लिहिला होता.
झाडावर आपल्या गर्लफ्रेंडचे नाव लिहिण्या पेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा...!!!
मग त्याने मैत्रिणींची यादी बनवली आणि शेवटी 4 एकरात सोयाबीन पेरले. 😝😝


Marathi Jokes Collection, Marathi Vinod

90 किलो ची पोरगी राव...

आणि ...

‪‎Facebook‬ वर नाव..



" Little angel "

अग देवाला घाबर जरा..कुठ फेडशील हे पाप पोरी.....
😂😂😂😂


लहान मुलाचा आणि दुकानदाराचा संवाद
मुलगा:काका डेटोल साबन आहे का?
दुकानदार:हो आहे ना
मुलगा:मग हात धुवा आणि एक बिस्किट पुडा द्या
#स्वच्छ भारत अभियान#


सह्याद्री चॅनेलवर हॅलो सखी कार्यक्रमात विचारलेला प्रश्न :-

मुलगी :  माझं वय अठरा वर्षे आहे. माझा रंग गोरा आहे.

माझी त्वचा खुप मुलायम आणि नाजुक आहे.

मी रात्री काय लावुन झोपू?
.
.
डॉक्टरांचा सल्ला:-  दाराची कडी.😆😆😆😆

मुलगा : आई  दिवाळीला मि ह्या दुकानातुन फटाकड्या घेनार  
आई : नालायक हे फटाकड्याचं दुकान.नाय मुलिंचे हॉस्टेल आहे 
मुलगा : मला काय माहित पप्पा एकदा म्हणत होते हितं एका पेक्षा एक फटाकडया आहेत
आई: हो का .. अत्ता घरी गेल्यावर पप्पा बघ  कसे रॉकेट सारखे आकाशात उडतील..
😂😂😂😂😂😂
Happy Diwali in advance

एक संन्यासी भेटला मी विचारल बाबा कसे आहात ......
ते म्हणाले - बेटा आम्ही तर संन्यासी आहोत ......
आमचा राम ठेवेल तसे आम्ही राहतो .....  😃☹
तुम्ही कसे आहात?
मी म्हणालो - आम्ही संसारी ....
आमची सीता ठेवेल तसे आम्ही राहतो .... ☹😜


चला आम्ही मान्य केल की लग्नात मुलींकडून हुंडा घेणे पाप आहे
.
.
मग मुलींना पण फक्त सरकारी नोकरी आणी लाखो रूपये पॅकेज वालाच मुलगा बघणे हे कोणत पुण्य आहे????

( अखिल भारतीय दहावी- बारावी पास/ नापास व ITI करून  चिडलेल्या मुलांची संघटना )😂😂😂😂😂

दुकानदार : काय पाहिजे
गिऱ्हाईक : मला ताकद पाहिजे हिंमत पाहिजे
अक्कल पण पाहिजे
दुकानदार : साहेबांना एक खंबा दे
आणि मुगदाळ  दे पाच वाली

ससा नेहमी धावतो ,पळतो
तरतरीत राहतो , त्याचे आयुष्य
असते 15 वर्षे .....
तेच कासव
ना धावपळ करते , ना उत्साही
राहते , ते जगते 150 पेक्षा जास्त वर्षे .....
यावरून धडा घ्या ,
कामधंदे सोडा ,😵😲
आराम करा ..😍😜
आणी watsaap वर Online बसा.
😄😄😜

एखादा जवळचा मित्र जर घरी आला तर,
पहिला अर्धा-एक तास त्याला हेच
समजवण्यात जातो कि..😰.
.
.
.
.
.
.
.
.
भावा शिव्या नको देऊ घरातले आहेत.......😱

कडक जोक ............
"पक्या' बस मधे उभा होता..;
.अचानक "ब्रेक' लागल्यामुळे समोरच्या "मुलीवर' जाउन पङला..,😧
"मुलगी: "नालायका, काय करतोस...?😡
"पक्या - "ङिप्लोेमा', तु काय करतेस...

व्यायाम करणे, ड्रिंक्स न घेणे व शाकाहारी राहणे ह्याने तुमच्या आयुष्यात काही वर्षे नक्की वाढतील.
पण लक्षात घ्या, की ही वर्षे तुमच्या म्हातारपणातली वाढणार आहेत, तरूणपणातली नव्हे!
                - भर रं तू 😝😂🍻🍻




Collection Excellent Thoughts in Marathi

सफलता नेहमी चांगल्या
      विचारातू येते,
🎪चांगले विचार हे नेहमी चांगल्या
       विचार असणा-या माणसांच्या
       संगतीतून येतात,
🎪आणि म्हणूनच मला अभिमान
      व आनंद आहे की मी चांगले
      विचार असणा-या लोकांच्या
      संगतीत आहे.

या जगात सर्वात...
           मोठी संपत्ती "बुध्दी"
      सर्वात चांगल हत्यार "धैर्य"
      सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"
      सर्वात चांगले औषध "हसू"    
  आणि आश्चर्य म्हणजे हे "सर्व विनामुल्य आहे".
🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹
।। नेहमी आनंदी रहा।।

👗 कपडे झाले छोटे,
🙈 लाज कुठुन येणार,
🌾 धान्य झाले हाईब्रेड,
💪 ताकद कुठुन येणार,
🌸 फुल झाली प्लास्टिकची,
😌 सुगंध कुठून येणार,
👩 चेहरा झाला मेकअपचा,
👸 रुप कुठून येणार,
👨 शिक्षक झाले टुयशनचे,
📚 विद्या कुठुन येणार,
🍱 भोजन झाले हाँटेलचे,
✊ तंदुरुस्ती कुठून येणार,
👻 प्रोग्राम झाले केबलचे,
😇 संस्कार कुठून येणार,
💴 माणसे झाली पैशाची,
🙏 दया कुठुन येणार,
🏭 धंदे झाले हायफाय,
🏢 बरकत कुठुन येणार,
😋 भक्ति करणारे झाले स्वार्थी,
👤 भगवंत कुठून येणार,
👫 मित्र झाले वॉट्सअपचे,
💃🏃 भेटायला कुठून येणार

प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे ,
दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका
आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा......!!

जेंव्हा मायेची आणि
‪‎प्रेमाची‬ माणसं आपल्या
 ‪‎जवळ‬ असतात..
तेव्हा‬ दुःख ‪कितीही
मोठं‬ असलं तरी त्याच्या ‪
वेदना‬ जाणवत ‪नाहीत‬.

मला हरण्याची कधीच भीती नाही
✒कारण मी जे काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ते शून्यातून करतोय.
✒मी एक दिवस चमकणारच हे निच्छीत आहे .
✒शेवटी साथ तुमच्या सारख्या गोड  माणसांची आहे..

गाय कचरा खाऊन सुध्दा दूध देते, तर साप दूध पिऊन देखील विषच देतो.ll
तसंच काही लोकांचं असतं.ll
तुम्ही ज्यांना मदत केलेली असते त्यातील जे कृतज्ञ असतात ते जाण ठेवतात, व जे कृतघ्न नसतात ते तुमच्या विरोधात कारवाया करतात,
हा त्यांच्यावरील संस्काराचा,सोबतीचा व त्यांच्या प्रवृत्तीचाच भाग असतो.।।
आपण आपले कर्तव्य करत जावे.।।

घड्याळ जरी "सोन्याचं" असलं पण त्यामध्ये"बॅटरीच" नसेल तर त्याची किंमत शुन्यच..!! माणूसही कितीही "मोठा" किंवा "श्रीमंत"असला पण त्यामध्ये "सत्कार्य" आणि"माणुसकी" ची उर्जा नसेल तर तो ही शुन्यच.."
जगातील सर्वात लांब आणि सुंदर इंग्रजी शब्द म्हणजे
          "SMILES
कारण  पहिल्या "S" पासून
दुस-या "S" पर्यंत पोहोचायला "MILE" लागतात...म्हणून......नेहमी हसत रहा...

मनापासून जीव लावला कि रानातलं पाखरु सुद्धा
आवडीनं जवळ येत
त्यामुळं आयुष्य हे
एकदाच आहे सर्वांवर
मनापासून प्रेम करा...

स्नेह एकदाच जुळतो.
स्नेहाचा धागा फार नाजूक असतो.
एकदा तुटला कि, परत जोडता येत नाही आणि जोडला, तरी गाठ राहते....कायमची!
फारच थोड्याच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो.
बाकी  सर्वाना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो....त्यालाच जीवन म्हणतात....!

सत्य सांगण्यासाठी कोणाच्या शपथेची गरज नसते
नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते
जे आपल्या हिमतीच्या जोरावर
जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते  

कधी चुक झाल्यास माफ करा पण,
कधी  माणुसकी कमी करु नका..!!
चूक  ही  आयुष्याचं  एक  पान  आहे, पण 'नाती ' म्हणजे  आयुष्याचं ' पुस्तक' आहे. गरज  पडली  तर  चुकीचं  पान  फाडून  टाका.पण एका पानासाठी अख्खं 'पुस्तक' गमावू नका...!!

आवडीचे लोक सवडीने वागायला लागले
की नात्यांना कवडीची किंमत राहात नाही.
नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप
चांगले मित्र आहेत.
नातं ठेवा अगर ठेवू नका,
विश्वास मात्र
जरुर ठेवा.
कारण जिथं विश्वास असतो
तिथं नातं
आपोआप बनत जात......

सोडू म्हणता सुटत नाहीत,
विसरु म्हणता विसरत नाहीत,
काही प्रसंग,
काही व्यक्ति,
काही केल्या डोळ्यांसमोरुन हटत नाहीत.
आपसुकच आठवते त्याला 'आठवण' म्हणतात.
आपुलकीची माणसं "सदासर्वदा आठवणीतच" असतात.

लोक म्हणतात सोन्याचा मोह कोणाला आवरत नाही,
👌पण माझ्याकडे सोन्या😘 सारखे " माणस "आहे..
मला बाकी कशाचीच कमी नाहीये.....! अगदी तुमच्यासारखे😘


कुलकर्णी स्थळ बघायला आलेला असतो......

कुलकर्णी - गाता येते का?

मुलगी - हो!

कुलकर्णी - गाऊन दाखव...

मुलगी - तो काय बाहेर वाळत टाकला आहे..

कुलकर्णी - ओह.... वाळू दे, वाळू दे!

मुलगी बाहेर जाते अणि मूठभर वाळू आणून देते ..

कुलकर्णी चक्कर येउन पडतो..

_______________________

थोड्या वेळाने तो तिला विचारतो.

आणखीन काय काय येतं?

मुलगी - सगळं येतं.

कुलकर्णी - तरी पण ....

मुलगी - ताप येतो, घाम येतो, कंटाळा येतो, राग येतो. . . . . . . . . . आणि वैताग पण येतो!

________________________

कुलकर्णी (वैतागुन) : English जमते का ?

मुलगी : हो पण सोड्यासोबत.

कुलकर्णी वारले...

😜😜😜😜😝😝😝😝😝

लग्नात त्याने प्रथमच तिचा हात हाती घेतला आणि मग त्याला आलेला अनुभव आणि त्याचा हातांचा पहिल्यांदा होणार स्पर्श ह्या अश्या सुंदर क्षणाला कवितेत गुंफण्याचा प्रयत्न केलाय !!
चुंबने कोवळ्या तळहातांची
आलिंगने लाजऱ्या बोटांची
हात तुझा सखे घेऊन हाती
भर्जरी स्पर्शाची जणू अनुभूती
झंकारती हळवी स्पंदने
तळव्यांच्या मधुमिलने
बरसती शहाऱ्यांच्या सरी
आषाढातील धुंद घनापरी
हात तुझा सखे घेऊन हाती !!!
लवचीक मनगटांवरी रुंजी
कुजबुजल्या कापऱ्या कांकणांची
अधीर निश:ब्दाची गुंजती
स्वरझंकृत नवथर गाणी
हात तुझा सखे घेऊन हाती !!!
मधु दवात तृप्ततेच्या
हस्त रेषाच विरघळल्या
दव भिजल्या तळव्यांवरी
रेशीम आठवणी लालकेशरी
हात तुझा सखे घेऊन हाती
भर्जरी स्पर्शाची जणू अनुभूती
जिवणीतुनि निथळती
विस्मयीत लाजरे मोती
गंधीत उसास्यांनी न्हाहली
ओठांवरली तीळ चांदणी
हात तुझा सखे घेऊन हाती
भर्जरी स्पर्शाची जणू अनुभूती !!!!