🐓 *कोंबडीचा रस्सा,*
🍖 *मटणाची साथ,*
🐟 *मच्छीची आमटी,*
                      *नी*
🍚 *बिरयानिचा भात,*
🍤 *बोंबलाची कढी,*
🍛 *भारलेल ताट,*

*खाउन घ्या सगळ*
              *"श्रावण"*

*महिना यायच्या आत.*

😂😂😂😂😋😋😋😄😄😄

वेगळं राहायचं सुख ।
ऊन ऊन खिचडी, साजुकसं तुप,
वेगळं राहायचं भारीच सुख !
एक नाही दोन नाही माणसं बारा,
घर कसलं मेलं ते बाजारच सारा.
सासुबाई- मामंजी,नणंदा नी दीर,
जावेच्या पोराची सदा पीर पीर.
पाहुणे रावळे सण नी वार,
रांधा वाढा जीव बेजार.
दहा मध्ये दिलं ही बाबांची चुक,
वेगळ राहायचं भारीच सुख!
सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ,
प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासू,
अन् एवढासा जीव झाला तरी विंचु तो विंचु.
चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी,
वीतभर लाकडाला हातभर ढलपी.
बाबांची माया काय मामंजीना येते ?
पाणी तापवलं म्हणुन साय का धरते?
बहीण अन् जाऊ यात अतंरच खुप,
वेगळं राहायचं भारीच सुख !
दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा,
दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा.
दोघांनी रहायचं, छान छान ल्यायचं,
गुलुगुलु बोलायचं नी दुर दुर फिरायचं .
आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी,
फिटतील सा-या आवडी निवडी.
दोघांचा असा स्वयंपाकच काय?
पापड मेतकुट अन् दह्याची साय ,
त्यावर लोणकढ साजुक तुप,
वेगळ राहायचं भारीच सुख. !
रडले पडले नी अबोला धरला,
तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला.
पण मेलं यांचं काही कळतंच नाही,
महिन्याचा पगार कसा पुरतंच नाही.
साखर आहे तर चहा नाही,
तांदुळ आहेत तर गहु नाही.
ह्यांच्याही वागण्याची त-हाचच नवी,
घोटभर पाणी द्यायला पण बायकोच हवी.
बाळ रडलं तर ते खपायचं नाही,
मिनीटभर कसं त्याला घ्यायचंही नाही.
स्वयंपाक करायला मीच,
बाळ रडलं तरी घ्यायचं मीच.
भांडी घासायची मीच,
अन् ह्यांची मर्जी पण राखायची मीच.
जिवाच्या पलीकडे काम झालं खुप,
वेगळं रहायचं कळायला लागलं सुख. !
सासुबाई रागवायच्या पण ब-याच होत्या,
सकाळचा स्वयंपाक निदान करत तरी होत्या.
मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे,
बाजारहाट करायला भावजी जायचे.
कामात जावेची मदत व्हायची,
नणंद बिचारी ऊर नि पुर निस्तरायची.
आत्ता काय कुठल्या हौशी नी आवडी,
बारा महिन्याला एकच साडी!
थंडगार खिचडी, संपलंय तुप,
अन् वेगळं व्हायचं कळलंय सुख.!!!

*पाऊस आलाय….थोडी पिऊन घ्या*

थोडा बियरचा गंध घ्या
थोडा चकन्याचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
*आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या*

बघा बियर बार उसळतोय
वारा दारु घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
*आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या*

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
*आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या*

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
*आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या*

संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली, की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करीत नाही..

ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे,
पण ती तुमच्या  विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबुन आहे.

टाल वाजे , मृदंग वाजे ,
वाजे हरीचा वीणा ,
माउली निघाले पंढरपुरा ......
मुखाने विट्ठल विट्ठल म्हणा.....
।।आषाढ़ी एकादशी च्या हार्दीक शुभेच्छा।।..

*_आजची वस्तुस्थिती_*
*_घरं मोठी पण कुटुंबं छोटी_*
*_भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब_*
*_दर्जेदार औषधं पण आरोग्य ढासळलेलं_*
*_चंद्रावर पोहोचले पण शेजाऱ्याशी ओळख नाही_*
*_प्रचंड पैसा पण मन:शांती नाही_*
*_उच्च बुद्ध्यांक पण भावनांक खालावलेला_*
*_माहिती खूप पण शहाणपण नाही_*
*_आणि सरतेशेवटी_*
*_माणसं भरपूर पण माणूसकीच नाही!_*

परमेश्वराने नात्याचा सुंदर कोमल गजरा गुंफिला आहे!

   कोणी हातात बांधला..

तर कोणी केसात माळला आहे!

कोणी त्यातील फुले अजूनही पुस्तकात
ठेवली आहेत!

पण राहिला तो सदैव त्याच्या जवळ ज्यांनी,
त्याचा सुगंध मनात जपला आहे! 👌👌

🌺झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि...
आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठ होत चाललोय.
प्रेम "माणसावर" करा त्याच्या "सवयीवर" नाही… . "नाराज" व्हा त्याच्या बोलण्यावर पण "त्याच्यावर" नाही… . "विसरा" त्याच्या "चुका" पण त्याला नाही… . कारण "माणुसकी" पेक्षा मोठ काहीच नाही…
   

🌸सदाफुली सांगते रुसुन रुसुन रहायच नसत हसून हसून जगायच असत.
🍁रातराणी सांगते अंधाराला घाबरायच नसत काळोखात ही फुलायच असत.
🌹गुलाब सांगतो येता जाता रडायच नसत काट्यात सुद्धा हसायच असत.
🌼बकुळी म्हणते सावळ्या रंगाने हिरमुसायच नसत गुणाच्या गंधाने जिंकायच असत.
🌷कमळ म्हणते संकटाच्या चिखलात बुडायच नसत संकटाना बुडवून फुलायच असत.

» रिमझिम धून, आभाळ भरून...
------------------------------------------

रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ?

मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून

गूज मनीचे मनाला, आठवूनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला, उगाच मनात बावरुन

वार्‍यात गाणे कुणाचे, गाण्यात वारे मनाचे
मनाच्या वार्‍यात आता, सुरात तुला मी कवळून

समर्थ रामदास स्वामी

जन्म : एप्रिल १६०८
मृत्यू : २ फेबुवारी १६८१
रामदासाचा जन्म मराठवाड्यातील जांब ह्या लहानश्या गावचा. मूळचे नाव नारायण सूर्याजी ठोसर. सिद्धपुरुष म्हणून लोक ‘समर्थ रामदास’ म्हणतात. त्यांनी महाराष्ट्रात राम, हनुमान ह्यांची मंदिरे काढली. राजकारण, धर्मकारण जाणीवपुर्वक अंतर्भुत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होय. करुणाष्टके, मनाचे श्लोक, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही त्यांची महाराष्ट्रात घरोघरी म्हटली जाणारी आरती.
समर्थांनी पूर्वसूचना देऊन माघ वद्य शके सोळाशे तीन सन १६८१ रोजी देह ठेवला. हीच दासनवमी होय.
दासबोधाचे लेखन त्यांनी रायगडाजवळील शिवथरघळीत बसून केले. चाफळ परिसरात समर्थांची व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. परमार्थ, अध्यात्म, श्रीराम व श्रीहनुमान भक्ती आणि संपूर्ण समाजाचा ‘नेटका प्रपंच’ या सर्वच बाबतीत स्वतः अत्युच्च स्थान गाठून समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या (आजही मार्गदर्शक ठरणाऱ्या) समर्थांनी शके १५७१ च्या वैशाखात समर्थांनी शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला. महाराजांच्याच विनंतीवरून त्यांनी पुढे सज्जनगडावर वास्तव्य केले. शके १६०२ (सन १६८०) मध्ये शिवाजी महाराज कैलासवासी झाल्यानंतर पुढच्याच वर्षी माघ वद्य नवमी शके १६०३ (सन १६८१) समर्थांनीही सज्जनगडावर देह ठेवला.

रघुनाथ अनंत माशेलकर





साधारणपणे १९५० ते १९६० या दशकातली घटना! मुंबईच्या युनियन हायस्कूल या शाळेत घडलेली. शाळा तशी गरीब परिस्थितीतली, पण तिथले शिक्षक मात्र श्रीमंत! धनाने नव्हे बरं ज्ञानाने. तिथेच भावे सर पदार्थविज्ञान शिकवायचे. प्रयोग करुन, विद्यार्थ्यांना अनुभव देऊन शिकवण्यावर त्यांचा विश्र्वास होता. साबण कसा करायचा, हे पाठ करुन परीक्षेत लिहिलं तर पूर्ण गुण मिळतात हे माहिती असून त्यांनी मुलांना, शिवडीला हिंदुस्तान लिव्हरचा साबणाचा कारखाना बघायला नेलं होतं. एकदा बहिर्गोल भिंगाविषयी शिकवतांना, त्यांनी सर्व मुलांना शाळेबाहेर उन्हात नेलं. भिंग खालीवर करुन, कागदावर एक प्रखर बिंदू मिळवला. त्यावर सूर्यकिरण एकवटले गेले होते.कागद जळू लागला. त्या क्षणी भावे सरांनी, आपल्या एका बुद्धिमान विद्यार्थ्याला हाक मारली, 'माशेलकर, तूही जर या भिंगाप्रमाणे, तुझ्यातल्या सर्व शक्ती एकवटल्यास तर जगात काहीही मिळवू शकशील.' या घटनेने, जीवनात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली माशेलकरांच्या ओंजळीत पडली आणि माशेलकरांसारखा एक प्रतिभावंत वैज्ञानिक भारताच्या ओंजळीत! सूर्यकिरणं समांतर जाऊ दिली तर त्यांच्यात प्रचंड शक्ती असूनही त्याचा वापर होत नाही. ही शक्ती एकवटली तर मात्र किमया घडवू शकते, हे तत्वज्ञान, छोटया रघुनाथच्या मनात खोलवर रुजलं. पुढे हेच रघुनाथ माशेलकर, सी. एस. आय. आर. चे प्रमुख झाले. प्रमुखपदाची सूत्रं हातात घेतली, तेव्हाही त्यांच्या मनात हीच भिंगाची घटना घुटमळत होती. त्या वेळी सी. एस. आय. आर. मध्ये २८,००० लोक कार्यरत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचं समातंर चालणं थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ठ पद्धतीने बांधलं आणि मग त्यातून निर्माण झालं, भारतीय वैज्ञानिक संशोधनाचं एक अचाट पर्व! एका सृजनशील शिक्षकाने, एका विध्यार्थ्याला दिलेल्या गुरुमंत्राने, भारताच्या प्रगतीच्या इतिहासात मोलाची कामगिरी घडवली.

मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचं आयुष्य घडवलं. त्यांच्या आई, हे त्यांचं प्रमुख प्रेरणास्थान!

रघुनाथ माशेलकरांचा जन्म कोकणातल्या माशेल गावाचा. बालपण मुंबईत गेलं. मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचं आयुष्य घडवलं. त्यांच्या आई, हे त्यांचं प्रमुख प्रेरणास्थान! शिवणकाम किंवा मिळेल ते काम करुन माशेलकरांच्या आई काही कमाई करत असत. एकदा त्या गिरगावातल्या काँग्रेस भवनात काम मागण्यासाठी गेल्या. संबंध दिवस तिथे उभं राहूनदेखील त्यांना काम दिलं गेलं नाही. त्या कामासाठी तिसरी उतीर्ण असणं आवश्यक होतं आणि माशेलकरांच्या आईंचं तेवढं शिक्षण नव्हतं. खोटं बोलून त्यांना कदाचित ते काम मिळवता आलं असतंही. पण तसं न करता, त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला - आज माझं शिक्षण नाही म्हणून मला काम मिळालं नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातलं सर्वोच्च शिक्षण देईन. हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ठ घेतले. अकरावीच्या परीक्षेत रघुनाथ माशेलकर बोर्डाच्या मेरिटमध्ये आले. पण परिस्थितीमुळे त्यांनी पुढे न शिकण्याचं ठरवलं. इथेही आईच्या आग्रहामुळे त्यांनी बी. केम. ला प्रवेश घेतला आणि १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा. एम्‌. एम्‌ शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकाच्या मार्गदर्शनाखाली, माशेलकरांनी आपली पी.एच.डी. ची पदवी प्राप्त केली. युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केलं.


आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारा, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारा हा माणूस, पुढे, इंग्लंडमध्ये, जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय ठरला.डॉ. माशेलकरांचा उल्लेख आला की त्याबरोबर लगेचंच आठवते ती त्यांनी जिंकलेली आगळीवेगळी हळदीघाटची लढाई! आपल्या सवानाच हळदीचे औषधी गणुधर्म माहिती आहेत. जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय, आपल्या देशात पूर्वापार वापरला जातोय. असं असतांना, एक दिवस सकाळी पेपर वाचत असतांना, एका विचित्र बातमीनं डॉक्टरांचं लक्ष वेधलं. अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचं त्या बातमीत म्हटलं होतं. थोडक्यात अमेरिकेने हळदीचं पेटंट घेतलं होतं. बातमी वाचताच माशेलकर बैचेन झाले.

आपल्याकडे अनेक पिढया चालत आलेलं हे ज्ञान, कोणीतरी स्वतःचं असल्याचा राजरोस दावा करतोय, हे योग्य नव्हे. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करुन आपले हक्क आपण राखले पाहिजेत, असा पक्का विचार करुन डॉक्टर कामाला लागले. जोरदार न्यायालयीन लढाई झाली. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रं जमा करुन, त्या सर्वांचा अभ्यास करुन, डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही अमेरिकेविरुद्धची हळदीघाटची लढाई जिंकली. यातून दोन चांगले परिणाम झाले. एक तर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा दूरगामी फायदा झाला. तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि सार्‍या जगाला कळली. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ठ्राला भारतीय ज्ञानाचं महत्त्व कळलं आणि आपण दुसर्‍यांच्या ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला. हाच प्रकार बासमती तांदळाच्या बाबतीतही घडला. त्याचेही पेटंट माशेलकरांनी परत मिळवले. सर जगदीशचंध बोस यांनी बिनतारी संदेश यंत्रणेचा म्हणजे वायरलेसचा शोध लावला, पण त्या शोधाचं श्रेय मात्र मार्कोनीला मिळालं. कारण बोस यांनी पेटंट घेतलं नाही, ते सर्व करुन मार्कोनीने सर्व अधिकार स्वतःकडे घेतले. १८९८ मध्ये बोस यांनी वायरलेस शोधलं होतं.


त्यानंतर १९९८ साली म्हणजे बरोबर १०० वर्षांनी बासमतीची लढाई जिंकून त्याचंही पेटंटं डॉ. माशेलकरांनी मिळवले. बोस ते बासमती अशा या ज्ञानाचा हक्क मिळवण्याच्या प्रवासात डॉ. माशेलकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ओषधांपासून ते खतांपर्यंत, जीवनोपयोगी रसायनांपासून ते गृहिणींसाठी छोटे उद्योग वसवून देण्यापर्यंत, अनेक लहान मोठया व्यवसायात डॉ. रघुनाथ माशेलकरांनी मार्गदर्शन केलं. व्यवस्थापनापासून ते स्वतः प्रयोगशाळेत संशोधन करण्यापर्यंत जातीने काम केलं आणि आजही ते तितक्याच जोमाने कार्यरत आहेत. सकारात्मक विचारांचा प्रचंड उस्फूर्त असा प्रवाह अनुभवायचा असेल तर, डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या सहवासात आयुष्यातले काही क्षण तरी घालवावेत; ते शक्य नसेल तर त्यांचे भाषण जिथे कुठे असेल तिथे ऐकायला जावं. तेही शक्य नसेल तर त्यांनी लिहिलेले भारताच्या प्रगतीच्या कल्पनांविषयीचे लेख वाचावेत. आणि मग आपल्या लक्षात येईल की, जगद्विख्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे, जबरदस्त सकारात्मक विचारांच्या मुशीतून घडलेलं, काही एक वेगळंच रसायन आहे.

भारताच्या अतिप्रचंड लोकसंख्येबद्दल आपण सर्वच जण चिंता व्यक्त करत असतो. पण त्याहीकडे पाहाण्याचा माशेलकरांचा दृष्ठीकोन आपल्याला, त्यांच्या सकारात्मकतेचं दर्शन घडवतो. ते म्हणतात, 'भारताची भव्य लोकसंख्या हाच एक मोठा खजिना आहे. भारतात वैचारिक स्वातंत्र्य असल्यामुळे जेवढी माणसं जास्त, तेवढया नवनवीन कल्पना पुढे येण्याला वाव. त्यातच भारतातली ५५ टक्क्याहून जास्त मंडळी तिशीच्या घरातली आहेत. म्हणजे हा तरुणांचा देश, अनेक नवनवीन धडाडीची कामं करु शकेल. आणि भारतातली सांस्कृतिक विविधता देशाला अधिक सृजनशील बनवेल. 'मराठीवर मनापासून प्रेम करणारे, मायबोलीतून विचार केल्यामुळे मी यशस्वी झालो' असं सांगणारे डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर, आपल्या तरुणांसाठी, खास करुन मराठी युवकांसाठी स्फूर्तिस्थान ठरावेत! पण हा आहे फक्त ट्रेलर, संपूर्ण चित्रपट ज्याला ज्याला शक्य होईल त्याने जरुर पहावा!

आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारा, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारा हा माणूस, पुढे, इंग्लंडमध्ये, जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय