मुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी..?

मुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी..?
---------------------------------------------------------------
माझ्याकडे एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले. मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले. पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला, एक दोन व्यवसायात अपयश आलेले, नोकरीतही तग धरत नाही, महिना २०-२५ हजार कमवण्याचाही आत्मविश्वास नाही. का झाले असावे असे? मुलांच्या एकंदर सर्व बाबींचे मानशास्त्रीय विश्लेषण केले आणि हा लेख लिहावासा वाटला, जेणेकरून सर्वसामान्य पालकांच्या जीवनात प्रकाश पडेल.

बरेच यशस्वी उद्योजक कोट्याधीश होतात, शेकडो इंजिनिअर्सना आपल्याकडे नोकरीस ठेवतात, पण अशा यशस्वी उद्योजकांचे बालपण कोमेजून गेलेले असते, त्यांना कॉन्व्हेंट व इतर ऐषोराम लहानपणात किंवा कॉलेज जीवनात मिळालेले नसतात. ज्यांना संपूर्ण सुखसोयी मिळतात, ते आयुष्यात अनेकदा अपयशी होतात, पण ज्यांना फाटक्या सुध्दा सुविधा मिळत नाहीत व ज्यांचे बालपण खडतर असते असे लोक यशस्वी बनतात; असे का, याचे मानशास्त्रीय विश्लेषण शास्त्रीय भाषेत खूपच क्लिष्ट आहे, तुम्हाला सहज समजावे म्हणून गरुड व पोल्ट्रीच्या कोंबडीचे उदाहरण घेतले आहे. गरुड हे स्वयंभू व शून्यातून आयुष्य सुखात करू, स्वत:च्या हिंमतीवर जगणाऱ्या यशस्वी व उद्योजक व्यक्तीचे प्रतीक आहे, तर पोल्ट्रीची कोंबडी ही ज्यांना लहानपणापासून सर्व गोष्टी आयत्या मिळाल्या व शेवटी स्वत: कोणतीही शक्ती न उरलेल्या व आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्तीचे आहे.

आज श्रीमंत पालक मुलांच्या भवितव्यासाठी अमाप पैसा खर्च करतात. पूर्वी शिक्षण एक वर्षासाठी २-३ हजारात व्हायचे, आज तो खर्च ३० – ३५ हजारात गेला. मुलांना कॉन्व्हेंट शाळा, सकाळी बिस्किट, मॅगी, केक, स्कूल बस, घरी परत आल्यावर हातात जेवण, पुस्तके व गाईड्स, क्लासेस, पॅरेंट मीटिंग, लॅपटॉप त्यावर शैक्षणिक माहिती, पालकही अभ्यास घेतात, मुलांना वार्षिक सहल, गृहपाठ, प्रोजेक्ट, अजून बरंच काही. मुलं बिचारी रोबोटप्रमाणे या सर्व घडणाऱ्या गोष्टींतून पुढे चालत राहतात, जसं मुंबईत गर्दीतून माणूस पळत राहतो. त्यानंतर हायस्कूलला असतानाच २०-२५ हजाराचा मोबाईल मिळतो. कॉलेजला गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक मिळते. विदेशात एमबीए करण्यासाठी पालक १०-१५ लाख भरतात व मुलगा फॉरेन रिटर्न होतो. तोपर्यंत सर्व काही आनंदात चाललेले असते. आपला मुलगा म्हणजे खूप हुशार, हिरो, मोठ्या कंपनीचा सीईओ वगैरे बनणार इत्यादी चर्चा, प्रशंसा सर्व नातेवाईक करत असतात. परंतु लवकरच दुर्दैवाने तो भ्रमाचा भोपळा फुटतो. मुलगा जेव्हा खऱ्या कॉर्पोरेट मार्केटमध्ये येतो, तेव्हा त्याचे स्थान शून्य असल्याचे कळते. १० ते १५ हजाराची नोकरीही मिळत नाही. उद्योजक व व्यवसाय करावा, तर वास्तवाचे कोणतेही ज्ञान नसते.

पोल्ट्रीच्या कोंबडीप्रमाणे ऐतखाऊ व लाडात वाढलेल्या अशा मुलाची मार्केटमधले गरुड एक मिनिटात शिकार करू शकतात व असा मुलगा व्यवसायात अपयशी होतो. काय चुकले असेल या पालकांचे? एवढा पैसा खर्च केला शिक्षणावर, मग मुलं अपयशी का? पालकांचे काय चुकत गेले, तर शाळेत असतानाच त्याला २०-२५ हजाराचा मोबाईल दिला; त्याला मोबाईल कोणतेही श्रम व तसदी न घेता मिळाला, पण ते २०-२५ हजार कमवायला बाहेर किती मेहनत करावी लागते ह्याचे ज्ञान तुम्ही दिले का? कॉलेजमध्ये गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक घेवून दिली, पण ते पैसे कमवण्यासाठी किती महिने, वर्षे कष्ट उपसावे लागतात हे मुलांना माहीत आहे का? जसे पोल्ट्रीच्या कोंबडीला पिंजऱ्यात बसवले जाते, रोज समोर खाद्य टाकले जाते; पण त्या कोंबडीला हे माहित नसते, की हे खाद्य शोधण्यासाठी शेतात किती फिरावे लागते, ते धान्य व खाद्य गोळा करण्यासाठी व मिळवण्यासाठी पंखात बळ असावे लागते, चालण्यासाठी पायात ताकद असावी लागते. ते पंखातील बळ व पायात ताकद ह्या कोंबडीत कधी येतच नाही.
http://m.facebook.com/MarathiVichar9
याउलट मला अनेक यशस्वी उद्योजक भेटतात, ज्यांची सुरवात शून्यातून झाली व आज करोडोचे मालक आहेत. लहानपणी शाळेची पुस्तके जुनी, फाटलेली, मित्रांची किंवा भावाची वापरली. शाळा घरापासून २-३ किलोमीटर होती, शाळेत जायला साधी सायकलही नव्हती. पाटी, दप्तर पाठीला अडकवायचे व मित्रांसोबत चालत जायचे. जेवणाच्या डब्यात आईने दिलेली भाजी व भाकरी खायची. आठवड्यातून एखाद्या दिवशी तेल लावलेली चपाती मिळायची. केक, मॅगी काय असते आणि ते जेवणाच्या डब्यात देतात हे माहितही नव्हते. शाळा सुटल्यावर स्वतःच अभ्यास करायचा, गृहपाठाबद्दल मित्रांना विचारायचे, नाही जमलं तर मास्तरांचा मार खायचा आणि सुट्टीच्या दिवशी आईला घरकामात व शेतात मदत करायची.

कधी कधी पारलेचा बिस्कीटचा पुडा मिळायचा यांच्यासाठी तोच केक. एक रुपयाचा रंगीत कागद आणायचा, झाडाचा डिंक काढायचा, बांबूच्या काड्या, दोन रुपयाची दोऱ्याची गुंडी व अशा तऱ्हेने हाताने बनवलेला पतंगाचा खेळ सुरू व्हायचा. (आज मुलांना २० हजाराचा मोबाईल पालक देतात, ते ५ रुपयात मिळणारी पतंगाची क्रिएटीव्हिटी कशी शिकवणार व तो मुलगा कल्पक उद्योजक कसा होणार?) कसे बसे बारावीपर्यंत शिक्षण करायचे. शिकण्याची इच्छा असते, इंजिनिअर व्हावे, पुण्याला जावे, मुंबईला जावे, परदेशात जावे, पण वडिलांनी साफ सांगितले, आपली तेवढी आर्थिक परिस्थिती नाही. आता कमवायला लागा आणि शिकायचेच असेल तर कमवत शिका. १२ वी नंतर छोटी मोठी कामे व खाजगी क्लासेस, थोडी फार शेती करायची व आपण कमावलेल्या पैशातून पुढचे शिक्षण पूर्ण करायचे. नोकरी कामधंदा व व्यवसाय स्वतःच शोधायचा. अशी मुलं पुढे होतात गरुड... कारण त्यांना लहानपणापासून खेळणी विकत घेण्यासाठी पटकन ५०० रुपये मिळत नाहीत. ती मुलं स्वत: विटीदांडू व पतंग बनवतात. त्यांच्यात क्रिएटीव्हिटी वाढीस लागते. ज्यांना पालकांकीडून फटक्यात पैसे मिळतात, तो डोके चालवायची तसदीच का घेईल? शाळेत असताना ज्यांना घरची शेती, घरकाम, दुकानातील काम करावे लागते, त्यांना काम केल्याशिवाय पैसा मिळत नाही हे कळते. गरुडाप्रमाणे त्यांच्या पंखात बळ येते. व्यावहारीक वास्तव त्यांना खूप कमी वयात कळते. १२वी नंतरच स्वत:च्या हिंमतीवर जगल्यामुळे गरुडाप्रमाणे स्वतःचे अन्न मिळवण्यासाठी स्वतः शिकार करायला शिकतात. अशी मुलं प्रचंड आत्मविश्वास असणारी असतात, त्यांच्यात प्रचंड व्यावहारिक ज्ञान असते. ते स्वत:चा निर्णय स्वतः घेतात. गरुडाप्रमाणे उंच भरारी घेण्याची त्यांची जिद्द असते. ह्या मुलांना सांगावे लागत नाही, ती प्रगतीच्या दिशेने सुसाट वेगाने सुटतात. जेव्हा ढगांचा गडगडाट होतो, तेव्हा कोंबड्या खुराड्यात लपून बसतात; पण गरुड मात्र ढगाच्या वरती जाऊन हवेत उडत असतो. जेव्हा अशा गरुड मुलांची स्पर्धेच्या जगात कोंबड्याप्रमाणे वाढवलेल्या मुलांशी भेट होते, तेव्हा गरुड मुलं ह्या कोंबड्याची शिकार करतात व यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतात. पालकांनो स्वत:ला विचारा तुम्हाला तुमच्या मुलांना काय बनायचे आहे गरुड की पोल्ट्रीची कोंबडी?

महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा, मराठी मुलं उच्चतम स्पर्धेत यशस्वी व्हावीत यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.

पुराणातील मिथक

पुराणांची विश्वासार्हता

आजकाल एक ट्रेंड झाला  आहे पुराणांना नावं ठेऊन त्यांच्यातल्या मिथकांची खिल्ली उडवायची. यामागचे कारण, राजनैतिक असो वा इतर, पुराणांमधील शुद्ध ऐतिहासिक मजकुरावर अन्याय करतं.

दुर्दैवाने आज पुराणांना नावं ठेवल्यावर तुम्हाला 'पुरोगामी' असे म्हटले जाते.

एकदा एका मित्राने मला विचारले होते " जगातले किती देश पुराण आणि वेदांचा अभ्यास करतात?" . माझं साधं सरळ उत्तर होतं, पुराण आणि वेद हे आपले ग्रंथ आहेत.

बाकीच्या लोकांनी त्यांचे अध्ययन करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि जरी ते करत नसले, तरी आपण ते केलेच पाहिजे कारण ते आपले ग्रंथ आहेत. हे कारण पुरेसे आहे, बाकीच्या कारणांची गरजच नाही.

त्रास हा आहे कि हिंदू धर्माशी निगडीत कुठलीही गोष्ट हि नेहमी मिथक म्हणूनच सांगितली जाते.

जेव्हा वासुदेव नि कृष्णाला नेले, तेव्हा यमुना बाजूला झाली हे मिथक आहे, पण जेव्हा मोसेस साठी इजिप्तचा समुद्र बाजूला झाला हि सत्य घटना आहे

रामायणात वानर बोलतात हे मिथक आहे, पण बायबल मध्ये कासव बोलतात हि सत्य घटना आहे

कुम्भकर्ण खूप मोठा होता, हे मिथक आहे, पण बायबल मध्ये गोलीअथ मोठा होता हि सत्य घटना आहे

कृष्णाने जे चमत्कार केले ते मिथक आहेत, पण जीझसनि केलेले चमत्कार हि सत्य घटना आहे

आदिवासी असलेला वाल्मिकी रामायण लिहू शकत नाही, पण निरक्षर असलेला मोहम्मद मात्र कुराण सांगू शकतो.

भीम आणि अर्जुन खूप बलवान होते हे मिथक आहे, पण सॅमसन आणि डेविड खांब तोडू शकत होते हि सत्य घटना आहे

सापांपासून प्रल्हाद बचावला हे मिथक आहे, पण बायबल मध्ये एक माणूस सिंहाच्या गुहेतून बचावतो हि सत्य घटना आहे

युधिष्ठीर जिवंत स्वर्गात जातो हे मिथक आहे, पण मोहम्मद घोड्यावर स्वर्गात जाणे हि सत्य घटना आहे

प्रत्येक धर्मात असेच मिथक असतात पण फक्त हिंदू धर्मातल्या गोष्टींना खोटे ठरवले जाते.

पुराणाच्या विश्वासार्हतेचं बोलायचं तर मी कोएनराड एल्स्ट हे काय म्हणत आहेत हे सांगतो--

"To the neglect of the legitimate history books, the ItihAsa-PuraNa literature, i.e. the Epics and the Puranas is like ignoring the historical Bible books (Exodus, Joshua, Chronicles, Kings) to draw ancient Israelite history exclusively from the Psalms, or like ignoring the historians Livius, Tacitus and Suetonius to do Roman history on the basis of the poet Virgil.  What would be dismissed as “utterly ridiculous” in Western history is standard practice in Indian history.

No serious historian would ignore the Exodus narrative simply because it also contains unhistorical episodes like the Parting of the Sea and the voice from the Burning Bush..So, if Biblical history can be accepted as more than fantasy, the same credit should be given to the historiographical parts of the Epics and Puranas."

पुराण आणि वेद हे आपले ग्रंथ आहेत,त्यात आपल्या लोकांची माहिती आहे, आपल्या राजांची,आपल्या ऋषींची,आपल्या राज्यांची. ते आपल्या भूमीवर लिहिले गेले, आपल्या पूर्वजांनी लिहिले, आपल्या संस्कृत भाषेत लिहिले. त्यामुळे हि फक्त आपलीच जबाबदारी आहे कि त्या ग्रंथांचे संवर्धन करण्याची व त्यांच्यातला ऐतिहासिक मजकूर बाहेर आणण्याची.

भारत माता की जय
                                             🌱🌴🌱

C/P

कोणी हे sms बनवते?

1) भारतात 33 करोड देव आणि लाखो बुवा बापु आहे मग भारत गरीब का आहे?

2) गणपती आणि सरस्वती विद्येची देवता आहे मग भारतात निरक्षरता का आहे?

3) भारतात ज्योतिष भविष्य सांगतात मग भुकंप, पुर, दहशतवादी हल्ले होतात मग ह्या ज्योतिषांना हे का नाही समजत?

*4) उपवास करुन मनोकामना पुर्ण होतात मग भारतात करोडो लोक उपाशी आहेत ज्यांना दोन वेळेच जेवण मिळत नाही मग त्यांना देव का प्रसन्न होत नाही?*

5) नवस करुन जर मुल होत असतील तर नवरा करायची गरज काय असे संत तुकाराम का म्हणतात?

6) तिर्थक्षेत्री दगड धोंडा पाणी असे संत तुकाराम का म्हणतात?

7) देव दर्शन करुन आल्यावर वाटेत गाडीला अपघात होऊन भक्त मरतात देवाच्या मंदीरात चेंगराचेगरी होऊन लोक मरतात मग *देव त्यांना का वाचवित नाही?*

8) देव चोरीला जात नाही फक्त _*दानपेट्या चोरीला जातात असे का?*_

9) मराठा, ओबीसी, एससी, एसटी लोकांच्या अंगात देव येतो मग ब्राम्हणाच्या अंगात देव का नाही येत?

10) देव आजार बरा करतो मग डाँक्टराकडेआपण का जातो?

11) देव आहे मग चोरी, बलात्कार, खुण का होतात?

12) सर्व 33 कोटी देवांनी भारतातच का जन्म घेतला? इतर देशात का नाही?

13) देवांना पोलिस संरक्षण का असते? देव स्वताच रक्षण का करु शकत नाही?

14) नवस करुन नोकरी मिळत असते मग अभ्यास करायची मेहनत करायची गरजच काय?

15) तिर्थक्षेत्रात भ्रष्टाचार केला जातो मग देव त्यांना शिक्षा का देत नाही?

16) देव सर्व काही देतो मग काम करायची गरज काय?

17) देवाच्या मंदीरा बाहेर भिकारयांची रांग का? 

वाट पहात आहे
तुम्हच्या उत्तराची
    परत वाचा

🤔🤔🤔

डार्विन च्या  सिंधातानुसार माकडा पासून  माणूस  झाला  हे  संपूर्ण  जग  मान्य करत आदि  मानव  नग्न राहायचा, आणि त्या  नंतर  किती  तरी शतका नंतर  कापडाचा  शोध  लागलाय  मग  माझा  सरळ  आणि  सोपा  प्रश्न ??
*देवाच्या अंगावर  कपडे कसे?*
कारण कापडाचा  शोध  आदिमानवा नंतर  लागलाय.

*मग देवाने  माणूस  निर्माण  केला  कि  माणसाने  देव ?*


तुम्ही म्हणता  रामायण आणि महाभारत  अति  प्राचीन  आहे.

मग धातू युग याचा  कार्यकाळ कधीचा आणि  मग  रामायण  महाभारतात, लोखंडी  भाले आले कुठून?

*चक्राचा शोध कधी लागला?*

तो तर  इसवीससना नंतर लागलाय मग रामायण आणि महाभारत अची प्राचीन  असेल  तर  रथाला  चाके कशी  काय????

रामायणात वानर पूल बांधतात आणि दगडावर राम अस लिहील तर पाण्यावर दगड तरंगतात हे तात्पुरत मान्य केल तरी  वानर लिहायला कुठल्या शाळेत गेली होती?

तसा उल्लेख असेल तर सांगा मग, हनुमान  पर्वत  उचलून  आणतो  तर सगळी वानर  सेना  उचलून  का  नेली  नाही  ????
वानरांना त्रास द्यायचं  कारण  काय ????

या जगात  अगदी फुला चा  जन्म  स्त्री केसर  आणि  पुकेसर एकत्र  आल्या शिवाय  होत  नसेल  तर,

*ब्रम्ह देवाच्या  बाहू मधून क्षत्रिय लोकांचा  जन्म  होतो  हे कस  शक्य  आहे ?*

*या जगात  मादी  जात  पिलाला  जन्म  देते  ब्रम्ह  देव  तर  पुरुष आहे.*

नारद  मुनी  ची  आई  सरस्वती, सरस्वती चा  बाप  ब्रम्हा..

*मग  नारद मुनी  ब्रम्ह  देवाचा  पुत्र  कसा??*
बापाची  मुलगी  बहिण असणार  ना  ????
मग  बहिण  आई  कशी???

ब्रम्ह देवाच्या  मुलीचा  मुलगा  ब्रम्ह  देवाचा  नातू  असायला  हवा  मग नारद  मुनीचा  बाप, ब्रम्ह देव कसा?

*इसवीसनाच्या पाचव्या शतकात आर्य भटाने [०]शून्याचा शोध  लावला.*

तर मग रावणाला  १०  तोंड होती  हि  कुणी  मोजली?

कारण  एकवर शून्य दिल्या  शिवाय  दहा  कसे  होतील  आणि  महाभारतात तर कौरव १०० आहेत येथे तर दोन  शून्य आहेत  आणि  अस  असेल  तर  *खर  कोण ? आर्य भट का रामायण  कि  महाभारत??????*

*आणखी  एक  प्रश्न आदिमानवापासून  आजचा  माणूस  तयार झाला   हे विज्ञानाणे मान्य केल आहे मग  आदिमानवाची  जात  कुठली  आणि  धर्म  कुठला ?????????*

या सर्व भाकडकथा, पुराण वाचून हसु येईल पण सत्य हेच की,
*अॅक्चुली देवाची निर्मिती मानवानेच केली..*
*मानवानेच जात, धर्म निर्माण केले..*

Source : Whatsapp

Can we change our registered mobile number for mobikwik?


Follow following steps :

1. Sign-in to your Mobikwik Account

2.Click on Menu icon on the top right side of the app home.

3.Then selectMy walletoption.

4.Now select Favorites and tap on your Primary number (Number that want to be change) 
which is at the top of the list.

5.On the next page select Edit option by clicking on a3 vertical dot Icon on the top right side.

6.After that verify your new mobile number with OTP to save it as your new primary number.

That's all you'd change successfully change your primary number.

Ganesh Chaturthi Invitations Marathi

*l lश्री l l*
*🙏🏻आग्रहाचे निमंत्रण🙏*

*दिनांक :-१३/९/२०१८ रोजी🌺गणेश चतुर्थी🌺 असल्याने  आमच्या घरी  पाच दिवसासाठी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहेत.. तरी आपण सर्वजण सहपरिवार आपल्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी वेळात वेळ काढून नक्की यावे.  असे सर्वांना*
*🙏🏻आग्रहाचे आमंत्रण🙏*🌹🏵💮🌸💐

  🌺 *गणपती बाप्पा मोरया* 🌺 *मंगलमूर्ती मोरया*
दर
*निमंत्रक* :-  🌹🌹🌹🌹🌹
 
🌺🌺🌺🌺🌺🌷💐🌺

Brother Sister Relations

भाऊ आणि बहिणीने हे स्टोरी नक्की वाचा डोळ्यात पाणी येईन अशी शब्द रचना😢😢😢😢

💕भाव बहिणीचं नातं खूप गोड असत
म्हणून भांडण झाल तरी एकमेका कडे ओढ असते💕

" एकदा तुझं लग्न झाल ना की मग संपली जबाबदारी..."  आणि हा  "तुझ्या लग्नात मी अजिबात रडणार नाही " अस म्हणणारा तो भाऊच असतो...

"चल हट ...काळी कुठली..तुझ्यापेक्षा मीच गोरा आहे.." अस म्हणून चिडवणारा तो भाऊच असतो...

सर्वाचे कपडे आपल्या पसंतीनुसार घेतो आणि स्वतःचे कपडे बहिणीच्या पसंतीनुसार घेणारा तो भाऊच असतो...

ही स्टाईल मला शोभुन दिसेल का..? अस १००वेळा विचारणारा तो भाऊच असतो...

"मला नवीन गाडी घ्यायची आहे प्लीज बाबांना सांग..?" असा मस्का मारणारा तो भाऊच असतो...

"माझ्या फोनला अजिबात हात लावायचा नाही,..असे म्हणून बहीणीचा फोन हक्काने घेणारा तो भाऊच असतो...

दादागिरी करून स्वतःचे कपडे धुवायला लावणारा तो भाऊ च असतो..

घरात जरी बहीणीशी भांडण झालेले असले तरी चारचौघात तिची स्तुती करणारा तो भाऊच असतो...

"आई..तु हीला समजावून सांग..नाहीतर मी हीला मारीन बरं का..?" असा टपोरी भाषेत धमकी देणारा तो भाऊच असतो...

परंतु.......

बहिणीच्या लग्नात शांतपणे
एका कोपर्यात....
आपलं तोंड लपवून ढसाढसा
रडणारा...तो...भाऊ..च असतो...!

ज्यांना बहीण आहे ते खरच खुप नशीबवाण आहे कारण बहीणीच्या तोंडुन शिव्या खाण्याचा आनंदच वेगळा असतो☺😛😄😃😌😙

खरचं बहीणीची काळजी घ्या कारण बहीन तुमच्यासंघ आयुष्यभर नही राहात

वाचन

📖 *वाचन का आवश्यक आहे ?* 📖

📚एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा !

📘 श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नसुन वाचन करणारेच श्रीमंत होतात जसे शरीरासाठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्‍यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो.

📙 जगाचा आतापर्यंत जो विकास झाला आहे तो वाचनामुळे आणि जगाचा आता र्‍हास होणार आहे तो टी.व्ही मोबाईलमुळे.

📒 पुस्तक वाचनारा माणूस कधीही व्यसन करत नाही आणि टी.व्ही मोबाईल हेच मुळी व्यसन आहे.

📕 वाचनामुळे ज्ञानात भर पडते, टि.व्ही मोबाईल मुळे माणूस Adicted होतो.

📔 टी.व्ही साठी मोबाईल साठी नेटवर्क लागते, वाचनासाठी फक्त माणूस जागेवर लागतो.

📓 वाचन करणारी माणसं मनाने विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात.

📚वाचन करणारा माणूस शांत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब वाढणे, हृदय विकाराचा झटका येणे अशा गोष्टी संभवत नाहीत. या उलट जास्त टी.व्ही. मोबाईल वापरणारेच विविध रोगांना बळी पडत असल्याचे समोर येत आहे.

📖 टी.व्ही मोबाईलमुळे मन शांतीचा भंग होतो तर वाचनामुळे भंग झालेली मनस्थिती शांत होते.

📔
वाचन करणारा माणूस लवकर झोपतो लवकर उठतो. टी.व्ही मोबाईल चक्कर मध्ये अडकणारे उशिरा झोपतात नी उशिराच उठतात. परिणामी शरीर संपदेसह श्रीमंतीही नष्ट होते. लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य लाभे.. अशी एक म्हण प्रचलित आहे.

📓 वाचन करणारा पुढे उद्योजक होतो तर वाचन न करणारा नोकरीवरच थांबतो.

📕 वाचन करणारा चार तासच काम करून करोडपती होतो तर वाचन टाळणारा बारा तास काम करून गरिबीतच मरतो.

📘 काही महाभाग तर नोकरी लागली की, जगातील मी एकटाच सिकंदर, आता मलाच सारे काही कळते, अशा  नंदनवनात वावरून वाचनच बंद करतात.

📕 वाचनामुळे माणूस नम्र होतो तर टी.व्ही मुळे माणूस भांडखोर नी मोबाईलमुळे आत्मकेंद्री होतो.

📚 जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते तेच खरे पुस्तक आणि जे कृती करायला लावते तेच खरे वाचन.

📒 आपल्या आयुष्यात दोन गोष्टींचा प्रभाव पडतो एक मित्र आणि एक पुस्तक, पुस्तकालाच आपला मित्र बनवा.

📙 टी.व्ही बघणारे प्रवास करतात, तर वाचन करणारे ध्येय गाठतात. टी.व्ही मोबाईलमुळे थकवा येतो तर वाचनामुळे तरतरी.

📚 जिथे वाचन होते तेथे विचार होतात आणि जेथे विचारांचे स्वातंत्र्य नाही तेथे गुलामी येते. वाचनामुळे ध्येय ठरवीता येते आणि गाठताही येते.

📕 तुमच्या ध्येयावरून तुमची लायकी पारखली जाते आणि तुम्ही किती मोठे ध्येय ठरविता ते तुम्ही कोणते पुस्तक वाचता यावर अवलंबून असते.

📓 ज्यांना आयुष्यात कोणतेही ध्येय नसतं तेच लोक पुस्तक वाचत नाहीत आणि ध्येयाविना जगणे म्हणजे बिगर पत्त्याचे पत्र पोस्टात टाकणे होय. पुस्तक चाळणे वेगळे आणि वाचनं वेगळं.

📖 *जगात जेवढे  लोक उपास मारीने मेलेत त्यापेक्षा जास्त लोक पुस्तक वाचन न झाल्यामुळे मेलेत. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातुन संपत्ती निर्माण होत असते.*

📖📘📚📓📔📕📙

Nice Thought in Marathi

!! स्वाभिमान विकुन मोठे होण्यापेक्षा
               अभिमान बाळगुन
      लहान राहीलेले  कधीही चांगले.!!

!! खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत     नाही.....
       पण मनाने श्रीमंत नक्की बना .....
        कारण कळस जरी सोन्याचा असला तरी.......
   लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात..!!

मन #चांगलं
आणि स्वभाव #Royal ठेवा ......
#देव आपल्याला काहीच कमी  पडु देणार नाही !!

सगळी दु:ख दूर झाल्यावर.....मन प्रसन्न होईल.....
हा भ्रम आहे......
मन प्रसन्न करा.....सगळी दु:खं दूर होतील...!!

'"आयुष्य नेहमीच एक संधी देते सोप्या शब्दात त्याला आज म्हणतात....!!

👌चांगली वस्तू .....👌चांगली व्यक्ती .....
                  आणि .....
        👌चांगले दिवस .....यांची किंम्मत निघून गेल्यावरच  कळते.... !!



 

Marriage Time Jokes Marathi

मांडवामध्ये पक्याचा लग्नसोहळा सुरू होता. 💑

ब्राम्हणाने जमलेल्या सगळ्यांना उद्देशून विचारणा केली...👉

हे लग्न होऊ नये असं जर कुणाला वाटत असेल तर त्या व्यक्तीने आताच सांगावं नाहीतर मग या उभयतांना पुढच्या आयुष्यभर शांतपणे जगू द्यावं.

ब्राम्हणाचे बोलणं संपताच सगळ्यात मागच्या रांगेतून एक सुंदर स्त्री
पुढे येऊ लागली.

*तिच्या हातात एक छोटं बाळ होतं...* 👧👼

त्या स्त्रीला 👸पाहताच नवऱ्या मुलीने पक्या च्या मुस्काटात मारली.
मुलीचे वडील त्यांची बंदूक आणायला धावले.
मुलीच्या आईने विषाची बाटली बाहेर
काढली.
मुलीच्या भावांनी मुठी वळल्या.

ब्राम्हणाने
कसंबसं सगळ्यांना थोपवून पुढे आलेल्या युवतीला विचारलं,

ताई,👸 तू का पुढे आली आहेस ?
.
.
.
.
.
.

ती म्हणाली,

*तुम्ही बोललेलं मागे काहीही ऐकू 😵येत नव्हतं म्हणून!!!!*

😍😍😂😂😍😍

बघू हुशार कोण?

ऐका मानसाचे चार अक्षरी नाव काय?ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नावदुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नावतिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नावव चारही अक्षर म्हणजे त्याचे नावसांगा पाहु ते नाव काय ?