🚶🏾हळू हळू वाचा खुप आनंद घ्याल ........

🚶🏾👌संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात......✍

🚶🏾👌आपण फुशारकीने इतरांना सांगतो नेहमी खुष राहत जा पण त्याचा रस्ता पण दाखवा...✍

🚶🏾👌काल एक व्यक्ती भाकरी मागून घेवून गेला आणि करोडोंचे आशिर्वाद देवून गेला, माहितीच पडत नव्हतं कि गरीब तो होता का मी.....✍

🚶🏾👌आयुष्याचं गाठोड सोबत बांधून बसलाय अनाडी जे घेवून जायच आहे ते कमवलच नाही.....✍

🚶🏾👌मी त्या नशीबाचे सगळ्यात आवडीच खेळणं आहे, जे रोज मला जोडते ते परत तोडून टाकण्यासाठी...✍

🚶🏾👌ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो वार कोणी आपल्यानेच केला आहे...✍

🚶🏾👌लहानपण हे कमालीच होतं, खेळता खेळता भले टेरेसवर झोपा किंवा जमिनीवर झोपा पण डोळे अंथरूणावरच उघडायचे....✍

🚶🏾👌हरवलोय आपण स्वतः पण देवाला शोधत बसलोय.......✍

🚶🏾👌गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा.......✍

🚶🏾👌आयुष्याची पण गजब खेळी आहे....सावरली तर "जन्नत"....नाहीतर फक्त तमाशाच आहे.....✍

🚶🏾👌आनंद हा नशीबातच असतो...कारण आरशामध्ये बघून सगळेच हसतात.....✍

🚶🏾👌आयुष्यपण व्हिडिओ गेम सारखं झाल आहे, एक लेवल पार केली तर पुढची लेवल ही त्याहीपेक्षा मुश्कील येते......✍

🚶🏾👌एवढी आवड तर पैसे मिळवायला पण लागत नाही जेवढी लहापणीचे फोटो पाहिल्यानंतर परत लहान व्हावस वाटत....✍

🚶🏾👌नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....✍

🚶🏾👌दुसऱ्या ला संपवण्याच्या प्रयत्नात स्वतः संपून जाल
त्या मुळे स्वतः च्या प्रगती कडे लक्ष दया!!!.....✍

🚶🏾👌जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं.
आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी......✍

🚶🏾👌क्षेत्र कोणतेही असो...
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही
आणि कष्ट प्रामाणिक असले....
की यशालाही पर्याय नाही..✍🏻

🚶🏾👌केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं....✍

🚶🏾👌"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे...,
लोकांच काय लोक " चुका"
तर "देवात" पण काढतात.....✍

🚶🏾👌सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,वेळ वाया जाईल....
हि दुनिया मतलबी झाली आहे,त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा,चांगली वेळ येईल....✍

🚶🏾👌जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.....✍

🚶🏾👌विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही...!!
तुम्ही चांगले कार्य करु लागले की विरोधक आपोआप तयार होतात...!!✍

🚶🏾👌कर्तृत्ववान व्यक्तींचा पराक्रम बघितला जात नाही...,
पण त्याचं चाक जमिनीत कधी अडकतय याकडे मात्र सर्वाचे लक्ष असते.....✍

🚶🏾👌एक मात्र नक्की खंर आहे की,चांगल्या रस्त्याला गतिरोधक,आणि......चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच.....✍

🚶🏾👌चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.....✍

🚶🏾👌एक सत्य  . . . 👇"नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते ".....✍

🚶🏾👌असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.....✍

🚶🏾👌"जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही.".....✍

🚶🏾👌क‍‍‌‌‌‍धी‍ही मिठासारखं आयुष्य जगु नका,की लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता वापर करुन घेतील.....✍

🚶🏾👌आयुष्यात स्वत:ला कधी उध्वस्त होउ देऊ नका
          कारण
लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाही।

Maharashtra Information

▪ " महाराष्ट्रा "बाबत माहिती▪

👉 स्थापना-01 मे 1960
👉 राज्यभाषा -  मराठी

👉राजधानी -  मुंबई
👉 उपराजधानी - नागपूर 
👉ऐतिहासिकराजधानी- कोल्हापूर
👉 सांस्कृतिकराजधानी- पुणे

👉 एकूण तालुके-353
👉 पंचायत समित्या 351
👉 एकूण जिल्हा परिषद-33
👉 आमदार विधानसभा 288
👉 आमदार विधानपरीषद 78
👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
👉 सुमद्रकिनारा-720 किमी
👉 नगरपालिका- 230
👉 महानगरपालिका-26
👉 शहरी भाग - 45%
👉 ग्रामीण भाग 55%
👉 लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
👉 क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
👉 संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
👉 सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर
👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
👉 जेवण फेमस जिल्हा - कोल्हापूर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
👉 महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - आष्टा  ( सांगली )🔴
👉 पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
👉 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई
👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
👉 पहिला संपूर्ण संगणीकृत     जिल्हा -नांदेड

👉 चित्रपट विभाग
मराठी चित्रपट नगरी - कोल्हापूर
बॉलिवूड चित्रपट नगरी - मुंबई

!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!

अस काहीतरी पाठवा ग्रुपमधे ज्यामुळे जनरल नॉलेज वाढेल
जास्तीत जास्त शेअर करा▪

मुलाचं लग्न झाल्यानंतर माझं कीचन पुर्ण बदललयं... सुनेने त्याला पुर्ण मॉडर्न बनवलयं..!!

बाहेर काम करुन घरी लवकर आली की किचनमधे शिरुन काही ना काही बनवण्याची तिला हौस आहे..

पुर्वी मी विळी घेऊन भरभर कांदा कापत होते पण आता तिने कांदा कापून द्यायच यंत्रही आणलयं.. खोबर किसायचंही....

खरंच.. जेवण बनवणं कीती सोप्पं झालयं!  *काही सासवा या सुधारणा स्विकारत नाहीत...* 

"आमच्या वेळी नव्हते बाई असले नखरे..स्वतःच्या हातानी करायचो सगळी कामे ."  अशी वाक्य फेकत विनाकारण सुनांना कमी लेखण्यातच त्या धन्यता मानतात...

अरे असु देत ना.. तुम्हाला नाही मिळालं तरुणपणात सुख म्हणून तर सुनांनीही घ्यायच नाही ?

उलट तुम्ही सुध्दा त्याच्या बरोबरीने नवीन एंजॉय करायचा प्रयत्न करा..
उद्या त्यांच्या सुना आल्या तर त्या आणखीन काहीतरी नवीन बदल करतीलच की... आपण जातं सोडून पीठाच्या गिरणीकडे वळलोच ना? पाटा वरवंटा सोडून मिक्सरला आपलसं केलच ना? मग येऊ देत की विचारातही आणखीन बदल... त्या यंत्रांशी खेळण्यात पण एक मज्जा आहे.. ती घ्या..
आणि सुनेने कौतुकाने समोर आणलेला पास्ताही मनापासून खा ! मग बघा ती सुध्दा तुमची चपाती भाजीही किती चवीने खातेय ते...

माझी सुन खाते मी केलेलं आवडीने.. मीही स्विकारलीय तिच्या हातची  वेगळी चव... 😊😊😊
आपल्या मुलासाठी सुन स्वत:ला बदलवतच असते की.. मग आपल्या मुलासाठीच आपणही जरा बदललं तर त्याचाच संसार सुखाचा होईल... तेच तर हवं असत ना आईला??

*आणि हो..* सुनेनेही आपल्या सासुबाईला आईसारखे मानावे.. त्यांच्या बोलण्यामागेही मुलाचे व कुटुंबाचे भले व्हावे हीच अपेक्षा असते..

*माणसाने बदल स्विकारले की नाती सुदृढ होतात..!!*

- एक सासुबाई

*BABA*

लहान असल्यापासून आई मुलांना
सांगत असते.......

इथे जाऊ नको-------बाबा मारेल,
तिथे जाऊ नको------बाबा मारेल,
झाडावर चढू नको---बाबा मारेल,
नदीकडे जाऊ नको--बाबा मारेल,
शाळेत जा नाहीतर--बाबा मारेल,

अभ्यासाला बस नाही तर
.............................बाबा मारेल,
हे करू नको नाही तर........................ बाबा मारेल,
ते करु नको नाही तर.........................बाबा मारेल.

मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात.

बाबांच्या भयाने शाळेत जातात.

बाबाने मारु नये म्हणून अभ्यास करतात.

बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात.

हळू हळू मुलं बाबां कडे दुर्लक्ष
करुन आई वरच प्रेम करु लागतात.

मना मधून बाबांना काढून टाकतात.
आणि आईच्या चरणावर   सर्वस्व अर्पण करतात.

बाबां पासून चार हात लांबच राहतात.
मुलं आईच गाणं गातात.
मुलं आई वर कविता लिहितात.

कोणतंच मुल बाबाला दुधा वरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासरांची गाय म्हणत नाही.

बाबांसाठी मुलाकडे 'शब्दच' नसतात.

मुलाच्या पायाला ठेच लागली तरीही मुले "बापरे" म्हणत नाहीत.

स्वामी तिन्ही जगाचा "बाबांविना"
भिकारी होत नाही.

साने गुरुजीनांही "श्यामचा बाप" दिसत नाही.

आई घरात असली कि, घर कस भरल्यासारखं वाटतं.

मुलांना बाबा घरात असला की, मात्र स्मशान शांतता..................... !

मुलं शप्पथ सुद्धा आईचीच घेतात.
बाबा शप्पथेच्याही लायकीचा नसतो.

बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या व आडनावाच्या मध्ये..........."नावापुरता"!

मुलं विठोबाला 'माउली' म्हणतात
धरणीला 'माय' म्हणतात. आणि देशाला 'माता' म्हणतात........ !

बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाच झालेला असतो हद्दपार................  !

बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा........

बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुल बुआ.............

बाबा म्हणजे केवळ रुपये, पैसे कमवण्याचे यंत्र.

तेवढं.........काम त्याने केलं की, त्याचं कर्तृत्व संपलं.........

असं असूनही बाबा मेल्यावर..........
मुलांच्या छातीत धडकी का भरते ?????????

का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस.....!

का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्या सारखी..........!

का वाटत मुलांना की आपण बेवारस झाल्या सारखं....!

का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर......!
का मुलं घाबरतात बाबा मेल्यावर...............!

कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा "पत्थरदिल" बाबा..................
प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो,
तेव्हा का वाटत मुलांना की, ...........................

डोळे मिटुन जी प्रेम करते तीला प्रेयसी म्हणतात..
डोळे उघडे ठेऊन जी प्रेम करते तीला मैत्री म्हणतात..
डोळे वटारुन जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात..
आणि स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला "आई"म्हणतात..

पण, डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो, त्याला पिता म्हणतात...
१ शेअर बाबांसाठी.👍🙏❤

पु. ल. म्हणतात -

खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो...

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो...बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो...

माणूस अपयशाला भीत नाही...अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते...

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही, त्याचा त्रास होतो...
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो...

सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही...

कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे...

रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते... तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं...

आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय...

ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते...

आयुष्य फार सुंदर आहे...
ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे...
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे...💞💞
🌺🌺🌺🌺
🌹🌺🙏🏻शुभ सकाळ🌹🌺🙏🏻

*वेडी ही बहीणीची माया*.....

भावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात, याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता.
जरुर वाचा आणि मित्रांना पाठवा...

माणसांच्या गर्दीत
हरवून बसला माझा भाऊ
सांगा ना त्याला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ......

एकुलता एक दादा
त्याला जिवापाड जपला
लग्न झाल्या पासून
वाहिनी च्या पदरा आड लपला
एक दिवस तरी नको वाहिनी ला भिऊ
सांग ना रे
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ......

नको दादा साडी मला
नको पैसा पाणी
तुझ्या सूखा साठीच
देवा ला करते विनवणी
सांग तुला कोणत्या रंगाचा  शर्ट घेऊ
सांग ना तुला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ....

काम गेलं तुझ्या दाजीचं
म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते
तळ हातावरले फोड बघून
तूझी आठवण येते
दादा चढउतार होतात जीवनात
तू घाबरुन नको जाऊ
सांग ना तुला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ...

उचलत नाहीस फोन म्हणून
वहीनीला केला
Wrong नम्बर करत
कट त्यांनी केला
नसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ
दादा सांग ना रे
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ...

आई बाबा सोडून गेले
घर पोरकं झालं
आठवणींचे आभाळ
डोळ्यामधी आले
वाईट वाटते शेजारी येतात  जेव्हा त्यांचे भाऊ
सांग ना तुला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ....

नको मला जमीन
नको घराची वाटणी
आवडीने खाईन
भाकरी आणि चटणी
काकूळती ला आला जीव
मनात राग नको ठेऊ
दादा सांग ना रे
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ .....
😔😔😔😔
आवडली तर नक्की शेयर करा
....🙏 कवयित्री   बहिनाबाई चौधरी)

Hasa Pot Bharun...

पोट धरून हसा..

दत्तुचि आई :  वीस वर्ष मला             
           काहीच मुलबाळ नव्हतं .

गन्याची आई : अगं बाई गं !
           मग काय केल हो तुम्ही ?

दत्तुचि आई : काही नाही !
          मग मी २१ वर्षाची झाले ,
         बाबांनी माझं लग्न लावून दिलं आणि वर्षभरात दत्तू झाला !!!
😜😜😜

नदी किनारी जोडपे बसलेलेे असते

प्रेयसी : तुझा काय प्लॅन आहे

प्रियकर : तोच ग ....

२५पैसा १ मिनीट

प्रेयसी : मर मेल्या मोबाईल मधेच

😆😎😎😏😏😁
 
पर्श्या ने कधीच गुटखा नाही खाल्ला...
.
.
तरी पण तो सल्या आणि लंगड्याच्या आधि मेला 😢😥

Moral:- प्रेम is खरतनाक than गुटखा  😂💪🙆🏻😃😃😃
😆😆😆😆😆😜
सरदार इंटरव्यू देने गया,
बॉस ने पूछा तुम कितने भाई बहन हो
सरदार: 5
बॉस: उन में तुम्हारा नंबर कौनसा है ?

सरदार: एयरटेल
😂😂😂😂😂😂😂

लोक म्हणतात कि एक दिवस
दारू  पिल्याने सतत सवय
लागते.
एकदम चूक

आम्ही लहान पणा पासून
अभ्यास  करतोय

लागली का सवय ?

याला म्हणतात Control. 😂😝😆😂😂😂

खुलता कळी खुलेना....
आमचा बोनस काय मनासारखा मिळेना
.
.
वैतागलेला कामगार
😄😄😄

बायकांची सरकारला विनंती :

मॅगीची तपासणी पुर्ण झाली असेल तर आता fair & lovely ला जरा मनावर घ्यावे,

6 आठवडे म्हणत अर्ध आयुष्य गेले पण रंग काही गोरा झाला नाही .
एक वैतागलेली काळी परी
😂😂😂😂😂😂😂😂😂

😀 एक भयंकर जोक 😀

प्रियकर - मी तुझ्या बरोबर लग्न नाही करू शकणार...

प्रेयसी - का ?

प्रियकर - घरचे विरोध करतात...

प्रेयसी - घरी कोण कोण आहेत ?

प्रियकर - बायको आणि दोन मुले...

😜😂😝😜

बर झाले ‪
‎लग्नासाठी‬ आरक्षण नाहीये

नाही तर

‪OPEN‬ ‪‎वाले‬ ‪‎
बिनलग्नाचे‬ मेले असते
😂😂😂😂😂😂😂

एका मुलीला घरी पाहुणे बघायला येतात... बहिण किचनमध्ये असते.  तिचा भाऊ किचनमध्ये गेल्यावर बहिण त्याला विचारते.,

बहिण : मुलगा कसा आहे?

भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला
फिल्मचा हिरो वाटतो....

बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो?☺

भाऊ : "फँड्री
😜😝😜😜😜😜😜

मानलेली बहीण,
मानलेला भाऊ,
मानलेले आई - बाबा, काका - मामा मावशी,
ही मानलेली नाती चालतात....

तर मानलेली " बायको " यात काय
प्रॉब्लेम?
😝😝
भावाचा मित्र भावासारखा असतो
बहिणीची मैत्रीण बहिणी सारखी
..................
तर बायकोची मैत्रीण
बायकोसारखी का नाही ??
हरी ओम् 😝😝

😝😉😜
☺☺☺😝😝😝😝
.😝😝😝

नविन आहे बाजारात. फेका दुसरी कडे😉😉😉😉
  जो येतो तो ग्रुप हालवतो

जो येतो तो ग्रुप हालवतो


च्यायला आता मी ग्रुपच
अम्बुजा सीमेंट चा बनवतो.
😂😂😜😜😛😛😝😝😄

एगदा सर बंड्याला प्रश्न विचारतात      सर :  कॉस थिटा ÷ साईन थिटा =?







बंड्या : पणदूर तिट्टा
😜😜😜😜

त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या.
ज्या,
सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या

" सर आज तुम्ही Homework चेक करणार होता ना??

👉लास्ट बेंच मित्रमंडळ..👈
😝😝😝😝😡😡😡

गुरुजी - हॉस्पिटलमधल्या ➕ चिह्नाचा अर्थ सांग पाहू.

बंड्या - उभा आहे तो डॉक्टर आणि आडवा आहे तो पेशंट..!


😳😨😱😃😄😆😝

मार्टिन ल्युथर किंगने सांगितले
"तुम्ही उडू शकत नसाल तर पळा.
पळू शकत नसाल तर चाला.
चालू शकत नसाल तर रांगा.
पण पुढे सरकत राहा."
.
.
एका मालवणी माणसाने विचारले,

.

"तसा नाय पन एवढी वडातान करून जावचां खय हा?
😂😂😂

पोरगी पोरग्याला:

"तुझी स्माइल काय गजब हायं..
दात कशे चमकुन रायले बे इतके...? 😁




पोरगं लाजून... ☺

"माझ्या तंबाकू मधे मीठ हाय..!"
😌😊😁😂😂😂😂

उपकार

💐खुप छानआहे नक्कीवाचा💐   

            *बोधकथा*

एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. खूप दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया  आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेव्हड्यात तिथे वाघ आणि वाघीण आले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात पिले म्हणाली, हिने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. मुलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतद्न्यतेने म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. तुला कुणीही त्रास देणार नाही.
आता बकरी मोठ्या धाडसाने जंगलात कुठेही वावरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका पक्षाने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला त्याबद्दल विचारले. बकरीने त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व पक्षाच्या लक्षात आले.
आपण पण असेच महान कार्य करायचे असे पक्षाने ठरवले.
एकदा पक्षी उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात पण अधिकच खोल जात असतात. पक्षी त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात घेतो. चांगली ऊब देतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी निघतो. उंदराच्या पिलांचा निरोप घेतो. उडायचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याला उडता येईना कारण त्याचे पंख पिलांनी कुर्तडलेले असतात.
चरफडत चरफडत कसाबसा पक्षी तिथून निघतो.
बकरीला भेटून विचारतो, "तू पण उपकार केलेस मी पण उपकार केले. पण फळ दोघांना वेगवेगळे कसे मिळाले?"
बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली

*"उपकार पण वाघासारख्यावर करावेत, उंदरा सारख्यावर नाही. कारण असे लोक नेहमी कामापूरते असून आपल्या स्वार्थाकरिता दूसरा पर्याया मिळाला कि ,सच्च्या व प्रमाणिक माणसाला ते विसरण्यातच त्यांची स्वभाव धन्यता मानतात आणि बहादूर लोक उपकार करण्या-याला लक्षात ठेवतात"*
👏👏👏👏👏👏
_

New Marathi Jokes

Teacher :-१८६९ मध्ये काय झाले ??.....

रमेश  :- गांधीजींचा जन्म ...

Teacher :- अगदी बरोबर तु बसखाली. ..

Teacher :-   सुरेश  तु सांग १८७२ मध्ये काय झाले .... .

सुरेश  :-  गांधीजी ३ वर्षाचे झाले...मी पण बसुका ..😜😜😝😝😝😝😝😝😝😝😝😂😂😂😂😂

एका कैद्याला फाशी देण्यापूर्वी
जेलर : एखादी अंतिम इच्छा
आहे काय?
कैदी: आहे ना. मला फाशी देताना
माझे डोके खाली आणि
पाय वर ठेवा!
😝😝😝😝😝
जेलर झेंडा घेऊन पंढरपुरकडे रवाना
😆😆😆😆

गुरुजी :गण्या ,  दालचिनी को मराठी
मे क्या कहते है?
.
.
.
.
.
.
गण्या  : सर, दालचिनी को मराठी
मे ‪"वरणसाखर"‬ कहते है।
😉😜😂😂😂
गुरुजी जागे वर कोमात
😜😜😜😜😜😜😜😜😜

kAvi is BacK
😉😂     आर्ची आणि परशा 
            जाते है शाळा 😢😯

😉😁😀शाळा मे आर्ची ला
                        लगता परशाचा लळा😐😯😃😄

😬😑😬     बादमे आर्ची दिखाती
        अपना मळा 😐😯😃

  😬😑😉   शेवटको क्यु काटते
           दोनोका गळा😉😂

     😉😑😯😑     ये बघके डोळे मे पाणी
                      आता है घळा घळा 😐😅😐😴

👨गुरुजी: पाण्यात राहणारे पाच जीव सांग..? ?
😮बंडू: मासा...

😊गुरुजी: छान !
अजुन चार नाव सांग...
.
.
.
😎बंडू: माश्याची आई , वडील , बहीण , भाऊ

😱गुरूजींनी पाण्यात उडी मारून आत्महत्या केली..😱
😜😜😜😜😂😜

मास्तर:
1)त्याने भांडी घासली.
2)त्याला भांडी घासावी लागली.
या दोन वाक्यात काय फरक आहे?

बंड्या:
पहील्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे.
आणि
दुस-या वाक्यात कर्ता विवाहीत आहे.

मास्तरचे डोळे भरुन आले..!!!!
😆😆😆😆😂😂😂😂😂

नवरा आपल्या नाराज बायकोच्या माहेरी दररोज फोन करत असतो ☎.
 
*सासू* - किती वेळा सांगितले की, ती आता तुमच्याकड़े येणार नाही म्हणून.
  मग दररोज फोन का करता ?
 
*जावई* - ऐकून छान वाटत म्हणुन .....
😂😂😂😂😂 
😜😜😜

*"बघून घेईन"*😡म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा

*"घेऊन बघतो "* म्हणा आणि आयुष्य सार्थकी लावा....🍺🍺

😝

बायका नवऱ्याला
'थोडं जेवून घेता का ?' 
ऐवजी
"थोडी घेऊन, जेवता का ?"
असं म्हणाल्या तर  नवरा बायकोची भांडणे किती कमी होतील ना !!
😜😜😜😜😝😝

एका पार्टीमध्ये दोन महिला💁🏻🙆🏻 एकमेकीना अजिबात सोडत नव्हत्या.

अगदी बसायला खुर्च्या देखील शेजारीशेजारीच पकडायच्या.
कहर म्हणजे, एक खुर्चीत बसू लागली की दुसरी तत्परतेने तिची खुर्ची पुसून  स्वच्छ करून  देत होत्या!

हे पाहून जमलेले सर्व जण
खूप आश्चर्यचकित झाले.
किती प्रेम हे!!!

नंतर एकाने खोलात जाऊन चौकशी केली तर असे समजले की,

त्या दोघी *नणंद-भावजया* होत्या आणि एकमेकींच्या साड्या नेसल्या होत्या. आपली साडी मळू नये म्हणून सारा आटापिटा चालला होता!!😜

😬😬😬